अ‍ॅपशहर

१२ वी पास पण आयुष्याच्या परीक्षेत नापास, निकालानंतर पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

परीक्षेत पास झाला मात्र आयुष्याच्या परीक्षेत नापास! १२ वी निकाल लागल्यानंतर पार्टी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा धक्कादायक शेवट झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jun 2022, 9:49 am
भंडारा : भंडाऱ्यामध्ये बारावी निकाल लागल्यानंतर पास झालेल्या तरुणासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रासोबत सेलिब्रेशन करायला गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम death after 12th result maharashtra


मिळालेल्या माहितीनुसार, बारावी पास झाल्यानंतर सेलिब्रेशन करणं तरुणाला महागात पडलं. कारण मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा वैनगंगा नदीत पात्रात बुड़ून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी रेल्वे पुलाखाली घडली. निखिल महादेव बालगोटे वय १७ वर्ष असं मृतकाचं नाव आहे.

Pre Monsoon Rain Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग, 'या' जिल्ह्यांना झोडपलं
बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये निखिलला ५७ टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागल्याच्याच दिवशी तीन मित्रांसह माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. नदी दिसताच पाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी पोहण्याचा मनोसोक्त आनंद घेतला. दरम्यान, निखिलचा तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला.

यावेळी त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना पाचारण केलं. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृतदेह वाहून गेला. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतक निखिल याचा नदीपात्रात शोध सुरु केला असता सुमारे एक ते दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालय इथं पाठविण्यात आला आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे. १२ वीच्या परीक्षेत पास झालेला निखिल मात्र दुर्देवाने जीवनाच्या परिक्षेत नापास झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख