अ‍ॅपशहर

वहिनी विधवा राहू नये म्हणून दिराने घेतला पुरोगामी निर्णय; विवाहाचे कौतुक देशभरात

पती​-पत्नी हे संसाररूपी रथाचे दोन चाक मानले जातात. त्यात एकही चाक तूटलं की जीवन असह्य होऊन जातं. पण या सगळ्यावर तरुणाने कौतूकास्पद कामगिरी केली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2022, 1:50 pm

Photos : मांजर समजून बिबट्याचा बछडा आणला घरी, चिमुकलीच्या पराक्रमाने सगळेच धास्तावले

भंडारा : भावाच्या निधनानंतर घरावर दुखाचा डोंगर कोसळला. अशात वहिनी आणि अडीच वर्षाचा पुतण्या डोळ्यासमोर होते. त्यांचं दुख पहावत नसलेल्या दिराने विधवा वहिनीला पुन्हा जगण्याचा आधार दिला आहे. आजही भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अनन्य साधारण महत्व आहे. पती-पत्नी हे संसाररूपी रथाचे दोन चाक मानले जातात. त्यात एकही चाक तूटलं की जीवन असह्य होऊन जातं. पण या सगळ्यावर तरुणाने कौतूकास्पद कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम widow married to brother in law in bhandara
वहिनी विधवा राहू नये म्हणून दिराने घेतला पुरोगामी निर्णय; विवाहाचे कौतुक देशभरात


हे सर्व प्रसंग आपल्या विधवा वहिनीवर येऊ नये, आपल्या अडीच वर्षाच्या पुतण्याला वडिलांचे प्रेम कमी पडू नये म्हणून एका मोठ्या मनाच्या तरुणाने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. एखद्या सिनेमाच्या पटकथेप्रमाणे ही घटना वास्तविकरित्या भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील खापा इथं घडली आहे.

मुंबई पोलिसांच्या छाप्यात २००० किलो बनावट पनीर जप्त, बनवण्याची प्रक्रिया वाचून हादराल
खापा इथे तीन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकेल्या योगेश बुरडे व विशाखा यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले होते. योगेश आणि विशाखा यांना एक मुलगा आहे. दरम्यान, एसटी महामंडळात नोकरीवर रुजू होऊ पाहणाऱ्या योगेशचा अचानक अपघातामध्ये मृत्यू झाला. पती योगेशच्या निधनानंतर विशाखासमोर मोठी संकटं होती. पण आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती म्हणून घरात सुनकन्या म्हणून वावरावी आणि नेहमी तिच्या कपाळावरचं कुंकु हसत खेळत असावं असा निर्णय कुटुंबियांनी घेतला.

यामुळे कुटुंबियांने योगेशच्या लहान भावाचा विशाखासोबत विवाह केला. यानंतर १० मे रोजी नातेवाईकांच्या उपस्थित नोंदणीकृत विवाह करून लग्नाच्या रेशिमगाठी बांधत विवाह बंधनात विधवा वहिनी आणि दिर अडकले. त्यांच्या या विवाहाचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.

लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख