म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा
बँक पीककर्जासाठी नकार देत असल्याने मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांनी ५० हजार रुपयांत किडनी विकण्याची परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. या मागणीने खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या आर्थिक चणचणीचा मुद्दा चर्चेला आला आहे.
दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील या पाच शेतकऱ्यांनी ९ जून रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात आपल्या व्यथा मांडताना शेतकरी म्हणाले, 'गेल्या वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँकेच्या लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्थेकडून पीककर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही. आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीककर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पीककर्जाचे पुनर्गठन आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी गरजवंताला प्रती किडनी ५० हजार रुपयांत विकण्याची परवानगी द्यावी,' अशी मागणीही या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बँकांकडून पीककर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. मात्र काही बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात उदासीनता दाखवित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बँक पीककर्जासाठी नकार देत असल्याने मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांनी ५० हजार रुपयांत किडनी विकण्याची परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. या मागणीने खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या आर्थिक चणचणीचा मुद्दा चर्चेला आला आहे.
दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील या पाच शेतकऱ्यांनी ९ जून रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात आपल्या व्यथा मांडताना शेतकरी म्हणाले, 'गेल्या वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँकेच्या लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्थेकडून पीककर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही. आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीककर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पीककर्जाचे पुनर्गठन आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी गरजवंताला प्रती किडनी ५० हजार रुपयांत विकण्याची परवानगी द्यावी,' अशी मागणीही या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बँकांकडून पीककर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. मात्र काही बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात उदासीनता दाखवित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.