चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार एंट्री झाली असून रात्रंदिवस पाऊस सुरू असताना नगरपरिषदेच्या गोदामाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील घुघुस इथे समोर आला आहे. घुघुस वासीयांच्या अनेक आंदोलनानंतर डिसेंबर २०२० मध्ये ग्रामपंचायतीचे अखेर नगरपरिषद मध्ये रूपांतर झाले होते. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला महिला मुख्याधिकारी म्हणून आर्शिया शेख यांची नियुक्ती सुद्धा झाली. येथील तहसीलदार निलेश गौंड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नगर परिषदेचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले. मात्र, ८ सप्टेंबरला पहाटे घुघुस नगरपरिषदेचा गोदामाला (ग्रामपंचायतची जुनी कौलारू इमारत) भीषण आग लागली.
सदर आगीत काही साहित्य आणि दस्तावेज जळून खाक झाली. इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला पण आगीचा रौद्ररूपावर नियंत्रण मिळविण्यास वेळ लागला व तेंव्हापर्यंत काही साहित्य आणि दस्तऐवज जळाले. एसीसी सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून आगीत अजून किती नुकसान झाले हे पोलिस तपासात पुढे येईल. मात्र, सदर आग कशी लागली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. सदर आगीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
भल्या पहाटे आगीच्या रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.सध्या आगीवर नियंत्रण मिळविले असून उर्वरित साहित्य आणि दस्तऐवज बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात आग लागल्याने अनेक चर्चांना परिसरात पेव फुटले आहे.
प्रशासक तथा तहसीलदार निलेश गौंड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आगीचे नेमकं कारण काय याची योग्य तपासणीसाठी पोलीस स्टेशन ला पत्र देणार असल्याचे सांगितले.
सदर आगीत काही साहित्य आणि दस्तावेज जळून खाक झाली. इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला पण आगीचा रौद्ररूपावर नियंत्रण मिळविण्यास वेळ लागला व तेंव्हापर्यंत काही साहित्य आणि दस्तऐवज जळाले. एसीसी सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून आगीत अजून किती नुकसान झाले हे पोलिस तपासात पुढे येईल. मात्र, सदर आग कशी लागली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. सदर आगीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
भल्या पहाटे आगीच्या रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.सध्या आगीवर नियंत्रण मिळविले असून उर्वरित साहित्य आणि दस्तऐवज बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात आग लागल्याने अनेक चर्चांना परिसरात पेव फुटले आहे.
प्रशासक तथा तहसीलदार निलेश गौंड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आगीचे नेमकं कारण काय याची योग्य तपासणीसाठी पोलीस स्टेशन ला पत्र देणार असल्याचे सांगितले.