अ‍ॅपशहर

२ वर्षांच्या मुलाला निमोनियाची लागण, १०८ क्रमांकावर फोन केला, पण...; बापासमोरच सोडले प्राण

Chandrapur News Updates : रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर मानववर वेळेवर उपचार झाले असते आणि त्याचे प्राण वाचू शकले असते. या घटनेतून आपल्या आरोग्य व्यवस्थेचं कटू वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2023, 8:34 am
चंद्रपूर : दोन वर्षांच्या मुलाला निमोनिया झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यानंतर पुढील उपचार वेळेत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रकृती ढासळत असल्याने सदर चिमुकल्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी रेफर करण्यात आलं होतं. त्यानंतर कुटुंबीयांनी १०८ या क्रमांकावर फोन केला. मात्र रुग्णवाहिका तब्बल चार तास उशिराने आली. रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधाही नव्हती. त्यामुळे वेळीच उपचार होऊ न शकल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मानव संजूसिंह बघेल असं मृत चिमुकल्याचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrapur boy
चंद्रपूर


मिळालेल्या माहितीनुसार, पोंभुर्णा शहरात भेलपुरी विकणारे संजूसिंह बघेल यांच्या दोन वर्षांच्या मुलाची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा इथं उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात पाठवण्याच्या निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. मानवच्या वडिलांनी १०८ ला भ्रमणध्वनी केला. रुग्णवाहिकेची तात्काळ गरज असल्याचे लक्षात आणून दिलं. मात्र तब्बल चार तास उशिरा रुग्णवाहिका आली.

महाराष्ट्रात चोरी करून चोर थेट गुवाहाटीला; पोलिसांनी बेड्या ठोकताच आरोपीबद्दल धक्कादायक माहिती उघड

रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोयही नव्हती. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने रस्त्यातच मानवने अखेरचा श्वास घेतला. मानवच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर मानववर वेळेवर उपचार झाले असते आणि त्याचे प्राण वाचू शकले असते. ग्रामीण रुग्णालय पोभूर्णा येथील सोयी-सुविधांवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात असते. अशातच या ताज्या घटनेनं नागरिकांकडून आरोग्य व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाचे लेख