अ‍ॅपशहर

Corona Update : 'या' जिल्ह्यात धाकधूक वाढली, कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ

Chandrapur Corona Update : कोरोना रुग्णांची अल्प संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज 31 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 31 जण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 6 Jan 2022, 8:18 am
चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येणार का? या विचाराने राज्याची चिंता वाढली आहे. दुसरीकडे ओमायक्रान व्हेरिएंट आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशात कोरोना रुग्णांची अल्प संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज 31 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Chandpur Corona Update 31 Corona positive Cases in last 24 hour


चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 31 जण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 24, बल्लारपूर 2, राजुरा 2, चंद्रपूर 1,भद्रावती 1 तर चिमूर येथे 1 रुग्ण आढळून आले असून ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 944 वर पोहोचली. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 339 झाली आहे. सध्या 60 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 3 हजार 406 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 लाख 13 हजार 50 नमुने निगेटीव्ह आलेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी , तसेच सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोनाची लस घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाचा विस्फोट, मुंबईतली वाढ धडकी भरवणारी!

कोरोना आणि ओमिक्रॉनने राज्याला आज मोठा हादरा दिला आहे. काल एकट्या मुंबईत १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले असताना आज तर मुंबईत कहरच झाला आहे. एकट्या मुंबईत आज १५ हजार १६६ रुग्ण मिळाले आहेत. तर राज्याचा आकडा २६ हजारांच्या पार गेला आहे. दुसरीकडे राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 8 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज