अ‍ॅपशहर

पावसाने बळीराजाच्या डोळ्यात आणला पूर, हाताशी आलेलं पिक पाण्याखाली

बळीराजाचे दुख बघून काळजाचे पाणी पाणी व्हावे. आकांत करणारा हा बळीराजा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Times 16 Nov 2021, 4:48 pm
चंद्रपूर : सोमवारला सावली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धान बांध्या पावसाने तुडूंब भरल्या. कापलेल्या धानाचे पुंजने पाण्यावर तरंगू लागले. तोंडात येणारा घास निसर्गाने हिरावला. पाण्यात तरंगणारे धान पुंजने हातात घेऊन एक बळीराजा आकांत करीत आहे. टाहो फोडीत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrapur news


बळीराजाचा आकांत असा की दगडालाही पाझर फुटावा. पाण्यावर तरंगणारे धान पुजने हातात घेऊन हा बळीराजा ढसाढस रडतो आहे. बळीराजाचे दुख बघून काळजाचे पाणी पाणी व्हावे. आकांत करणारा हा बळीराजा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील असल्याची चर्चा आहे.

गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! जिल्हाअध्यक्षांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची शक्यता
समाजमाध्यमात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. पाऊस बरसला मात्र, या पावसाने बळीराजाचा डोळ्यातही पूर आणला. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे हे दुख बघून मायबाप सरकारला जाग का येत नाही ? हा खरा प्रश्न आहे. कर्जबाजारी होवून बळीराजा शेती उभी करतो. ऐनवेळी निसर्ग घात करतो. यातून बळीराजा गळ्याभोवती फास आवळतो. मायबाप सरकारही बळीराजाचे दुख: जाणून घेण्याचे प्रयत्न करीत नाही. हा टाहो सरकारचा कानापर्यंत पोहचायला पुन्हा किती बळीराजांना आहूती द्यावी लागणार? असा प्रश्न आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज