अ‍ॅपशहर

४०० जणांसमोर केला जवानाचा खून

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणा-या लष्करी जवानाची भर चौकात गावक-यांसमोर चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सय्यदनगरमध्ये घडली आहे. विनोद पवार असं मृत जवानाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार सरपंच आणि पंचमंडळींबरोबच ४०० गावक-यांच्या उपस्थितीमध्ये घडला.

Maharashtra Times 14 May 2016, 10:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । धुळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम army jawan vinod pawar stabbed to death in front of 400 people
४०० जणांसमोर केला जवानाचा खून


बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या लष्करी जवानाची चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सय्यदनगरमध्ये घडली आहे. विनोद पवार असं मृत जवानाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार सरपंच आणि पंचमंडळींबरोबच ४०० गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडला.

पंजाबच्या पठाणकोटमध्ये लष्करी सेवेत असलेले विनोद पवार एका परीक्षेसाठी आपल्या मूळगाव असणा-या सैय्यदनगरमध्ये आले होते. गावातमधील पवार आणि राठोड गटात मागील अनेक वर्षांपासून वैर आहे. समोरच्या गटातील काही तरुणांनी आपल्या बहिणीची छेड काढल्याबद्दल विनोद यांनी आरोपींना जाब विचारला. काही दिवसापूर्वीच हा जाब विचारल्याचा राग मनात ठेवत गावातीलच दुसर्‍या गटातील काही तरुणांनी विनोदला दोन दिवसांपूर्वी मारहाण देखील केली होती. या मारहाणीप्रकरणी विनोदने गावातील वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यावेळी गावकर्‍यांनी पंचायतीमध्ये सर्वांच्या समोर हा वाद मिटवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील सरपंच आणि पंचांच्या मंडळाने गावात बैठक बोलवली होती. बैठकीसाठी विनोद आणि त्याच्या कुटुंबियांनाही बोलावण्यात आले होते. दोन्ही बाजूने पंचासमोर दोन गटातील वाद मिटवण्यासाठी चर्चा सुरू असतानाच आधीच दबा धरून बसलेल्या समोरच्या गटातील काही तरुणांनी विनोदवर सर्वांसमोरच चाकूने वार केले. कुणाला काही कळण्याच्या आतच हा हल्ला झाला. या हल्ल्यात विनोद गंभीर जखमी झाले आणि ते पंचांसमोरच रक्तबंबाळ होऊन पडले. हल्ला झाल्याचे पाहून उपस्थितांची एकच धावपळ सुरू झाली. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. विनोद यांच्या मृत्यूनंतर गावातील पवार आणि राठोड गटातील तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

विनोद यांच्या खूनाची बातमी वाऱ्यासारखी परसल्यानंतर गावात तणाव वाढला. हाणामारी आणि तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून गावात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज