म. टा. वृत्तसेवा, धुळे
राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक पूल हा ‘ब्रिज कम बंधारा’ असेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात केले. धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे चौपरदीकरण आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे, महापौर कल्पना महाले, खासदार हिना गावित, आमदार काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, अमरिश पटेल, अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे आदी उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, धुळे ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हा रस्ता पुढील ५० वर्षे खराब होणार नाही अशा पद्धतीने त्याचे काम केले जाईल. शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महामार्गावर ब्रिज कम बंधारे बांधण्याचा प्रयत्न आहे. त्यात अडविलेले पाणी हे शेतीसाठी उपयोगात आणले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात येत्या काही वर्षांत सात नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहेत. शिवाय तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन रोजगार उपलब्ध होऊन विकासाला गती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविकात डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, केंद्र शासनाने मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढा मोठा निधी धुळे जिल्ह्याला मिळाला आहे.
सहा महिन्यांत रेल्वेमार्गाचे काम
येत्या सहा महिन्यांत मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गाचे भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री धुळ्यात येतील, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. देशभरात ठिकठिकाणी जलमार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे दळणवळणाची सुविधा सोयीस्कर होणार आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले.
आरक्षणाचा फलक झळकला
गडकरी यांच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांमधून काहींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे फलक हातात धरून सर्वांच लक्ष वेधले. काही वेळाने पोलिसांनी हे फलक ताब्यात घेतले.
अमरावती-सुरत महामार्गाचा कोनशिला समारंभ
नंदुरबार : अमरावती ते सुरत या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिलेचा समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते नवापूरला झाला. आदिवासी गोरगरीब जनतेला दिलेला आश्वासनाची पूर्तता करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. या रस्त्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक पूल हा ‘ब्रिज कम बंधारा’ असेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात केले. धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे चौपरदीकरण आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे, महापौर कल्पना महाले, खासदार हिना गावित, आमदार काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, अमरिश पटेल, अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे आदी उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, धुळे ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हा रस्ता पुढील ५० वर्षे खराब होणार नाही अशा पद्धतीने त्याचे काम केले जाईल. शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महामार्गावर ब्रिज कम बंधारे बांधण्याचा प्रयत्न आहे. त्यात अडविलेले पाणी हे शेतीसाठी उपयोगात आणले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात येत्या काही वर्षांत सात नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहेत. शिवाय तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन रोजगार उपलब्ध होऊन विकासाला गती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविकात डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, केंद्र शासनाने मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढा मोठा निधी धुळे जिल्ह्याला मिळाला आहे.
सहा महिन्यांत रेल्वेमार्गाचे काम
येत्या सहा महिन्यांत मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गाचे भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री धुळ्यात येतील, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. देशभरात ठिकठिकाणी जलमार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे दळणवळणाची सुविधा सोयीस्कर होणार आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले.
आरक्षणाचा फलक झळकला
गडकरी यांच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांमधून काहींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे फलक हातात धरून सर्वांच लक्ष वेधले. काही वेळाने पोलिसांनी हे फलक ताब्यात घेतले.
अमरावती-सुरत महामार्गाचा कोनशिला समारंभ
नंदुरबार : अमरावती ते सुरत या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिलेचा समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते नवापूरला झाला. आदिवासी गोरगरीब जनतेला दिलेला आश्वासनाची पूर्तता करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. या रस्त्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च आहे.