म. टा. वृत्तसेवा, धुळे
तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर व पोलिस प्रशासनावर दगडफेक केल्यावरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
ते गुन्हे मागे घेण्याची विनंती आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
धुळे व साक्री तालुक्यासाठी वरदान ठरलेला अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिंचन विभागाला सूचना कराव्या आणि डाव्या कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळून पिकांचे नुकसान होऊ नये, असा प्रयत्न शेतकऱ्यांचा होता. त्यासाठी जिल्हा प्रशासन व सिंचन विभागाला निवेदने देण्यात आली होती.
मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २० सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कालव्यातून पाणी सोडावे यासाठी आंदोलन केले. प्रशासनाला निवेदन दिले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्याबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतांना अज्ञात लोकांनी प्रवेश करून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक सुरू केली. या प्रकाराचे सर्व खापर शेतकऱ्यांवर फुटले आणि आंदोलन करणाऱ्यांपैकी ७९ शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.
तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर व पोलिस प्रशासनावर दगडफेक केल्यावरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
ते गुन्हे मागे घेण्याची विनंती आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
धुळे व साक्री तालुक्यासाठी वरदान ठरलेला अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिंचन विभागाला सूचना कराव्या आणि डाव्या कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळून पिकांचे नुकसान होऊ नये, असा प्रयत्न शेतकऱ्यांचा होता. त्यासाठी जिल्हा प्रशासन व सिंचन विभागाला निवेदने देण्यात आली होती.
मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २० सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कालव्यातून पाणी सोडावे यासाठी आंदोलन केले. प्रशासनाला निवेदन दिले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्याबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतांना अज्ञात लोकांनी प्रवेश करून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक सुरू केली. या प्रकाराचे सर्व खापर शेतकऱ्यांवर फुटले आणि आंदोलन करणाऱ्यांपैकी ७९ शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.