धुळे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी ते मार्च २०१७ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली असल्याची दिसून आले. धुळे जिल्ह्यातील पंधरा कॉलेजेसचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्ह्यातून एकूण २५,५७३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी २१,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना दि. ९ जून रोजी आपापल्या शाळेत गुणपत्रिका वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी दि. ३१ मे ते ९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यात १,३६६ विद्यार्थी उच्च, १२,१९८ प्रथम, ८,४०२ द्वितीय आणि २२० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
धुळे जिल्ह्यात २१,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी ते मार्च २०१७ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
Maharashtra Times 31 May 2017, 4:00 am