अ‍ॅपशहर

नंदुरबार जिल्ह्यात पाणीबाणी

आदिवासीबहूल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी हे तालुके असून, सर्व तालुक्यांत दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीसाठाही जून महिन्याअखेर पुरेल एवढाच शिल्लक असल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्याचे चित्र आहे.

Maharashtra Times 13 May 2019, 5:00 am
जूनअखेर पुरेल एवढाच पाणीसाठा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drought condition ins nandurbar district area
नंदुरबार जिल्ह्यात पाणीबाणी


म. टा. वृत्तसेवा, धुळे

आदिवासीबहूल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी हे तालुके असून, सर्व तालुक्यांत दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीसाठाही जून महिन्याअखेर पुरेल एवढाच शिल्लक असल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प शिवण, दरा, नागण आणि कोरडी मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. मात्र, अजूनपर्यंत प्रशासनाकडे टँकर व विहीर अधिग्रहणाची मागणी करण्यात आलेली नाही. नवापूर तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत असून, नागण प्रकल्पातून पाणी सोडण्याची आणि नवागाव येथील केटीवेअर नादुरुस्त असल्याने प्रकल्पातून पाणी सोडल्यावर ते थेट गुजरात राज्यात वाहून जाईल. त्यामुळे सर्वप्रथम केटीवेअरची दुरुस्ती आणि मग प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, असे लेखी स्वरुपात पत्रदेखील जिल्हा जलसंपदा विभागाला देण्यात आले होते. यामुळे अखेर शिल्लक पाणीसाठ्यावरदेखील पाणी फिरले असून, नवापूरकरांची तहान ऐन उन्हाळ्यात नेमकी कशी भागणार हा प्रश्न कायम आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज