धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला आज गारांच्या पावसाने चांगलेच झोडपून काढलं आहे. दुपार पासूनच वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने साक्री तालुक्यातील शेतकरी आणि वाहन चालकांची चांगलीच धांदल उडाली. तसेच अचानक पडलेल्या लिंबूच्या आकारएवढ्या गारांनी शेतकऱ्यांचे शेतीचे पुन्हा मोठे नुकसान झालं आहे. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज सकाळपासूनच साक्री तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी अचानक ३ वाजेच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्यांसह गारांचा पाऊस सुरु झाला. अचानक झालेल्या गारपिटीमुळे साक्री परिसरातील शेतकरी आणि वाहन चालकांची चांगलीच धांदल उडाली. कसेतरी करून आपले घर किंवा सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी गडबड सुरू झाली. शेतकऱ्यांच्या घराबाहेर उभे असलेल्या जनावरांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. साक्री तालुक्यातील निजामपुर भागात जोरदार गारपिट झाली आहे.
साक्री तालुक्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. साक्री परिसरात यंदा निम्म्याहून जास्त शेतकऱ्यांनी कडधान्य पिके घेतली होती. त्या पिकांचे आंबा मोहोर आणि काही प्रमाणात आंब्याच्या कैरीही गळून पडल्या. तसेच जनावरांसाठी गोळा केलेला चारा तसेच शेतातच काढून ठेवलेला गहू पूर्णपणे भिजून गेला आहे. परिणामी अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे बळीराजा पुन्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे.
साक्री तालुक्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. साक्री परिसरात यंदा निम्म्याहून जास्त शेतकऱ्यांनी कडधान्य पिके घेतली होती. त्या पिकांचे आंबा मोहोर आणि काही प्रमाणात आंब्याच्या कैरीही गळून पडल्या. तसेच जनावरांसाठी गोळा केलेला चारा तसेच शेतातच काढून ठेवलेला गहू पूर्णपणे भिजून गेला आहे. परिणामी अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे बळीराजा पुन्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे.