अ‍ॅपशहर

पावसाच्या हुलकावणीने पेरण्या खोळंबल्या

यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४२.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत ३७ टक्के पेरण्या झाल्या असून, बळीराजाला आता दमदार पावसाची आस लागून आहे.

Maharashtra Times 11 Jul 2018, 5:00 am
धुळे जिल्ह्यात केवळ ३७ टक्के पेरणी; शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम due to no expected rains in dhule district crops sowing not done
पावसाच्या हुलकावणीने पेरण्या खोळंबल्या


म. टा. वृत्तसेवा, धुळे

यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४२.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत ३७ टक्के पेरण्या झाल्या असून, बळीराजाला आता दमदार पावसाची आस लागून आहे.

गेल्या आठवड्यात शनिवारी शहरात पावसाने हजेरी लावली खरी मात्र, त्यापेक्षा दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आले. जिल्ह्यात एक लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते, अशी भीतीही शेतकरीवर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्याला धुळे तालुक्यात ३९.६ टक्के तर शिंदखेडा तालुक्यात ३४.३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

धुळे जिल्हा नेहमीच पावसाच्या प्रतीक्षेत राहिल्याने यंदाही पावसाने दोन ते तीनवेळेस आपली हजेरी देत नंतर हुलकावणी दिल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४२.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वात कमी ८० मिलिमीटर शिंदखेडा तालुक्यात तर सर्वाधिक १८२ मिलिमीटर पाऊस धुळे तालुक्यात झाला आहे. त्याचबरोबर १८० मिलिमीटर पाऊस साक्रीत व शिरपूर तालुक्यात १२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कपाशीच्या क्षेत्रात घट
पावसाचे प्रमाण कमी असल्याने अद्याप भात, नाचणीची पेरणी झालेली नाही. जिल्ह्यात यंदा दोन लाख पाच हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतपर्यंत एक लाख दोन हजार ११ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. त्यात सहा हजार ५०० हेक्टर कापूस बागायती क्षेत्रावरील आहेत. आतापर्यंत ३५ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची, ११ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची व १२ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची पेरणी झाली. येत्या आठवड्यात दमदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागतील. पाऊस लांबल्यामुळे कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असून, तूर आणि सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. पीकविमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी १४ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक यांनी केले आहे.

जिल्ह्यातील पेरणीची आकडेवारी...
पेरणीचे उद्दीष्ट...........चार लाख ३९ हजार ५०० हेक्टर
प्रत्यक्षात पेरणी...........एक लाख ६२ हजार ६७९ हेक्टर
सर्वाधिक पेरणी..........४३.६५ टक्के शिरपूर तालुका
सर्वात कमी पेरणी.......३०.९५ टक्के साक्री तालुका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज