अ‍ॅपशहर

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

तालुक्यातील आंबोडे येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

Maharashtra Times 25 May 2016, 4:00 am
धुळे : तालुक्यातील आंबोडे येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer sucide
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


दरम्यान येथील अनिल सरग (वय ३५) या शेतकऱ्याने सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेला असता त्याठिकाणी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार जवळच असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी उपचाराससाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केला असता मृत घोषीत केले. अनिल सरग यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज