अ‍ॅपशहर

'जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे आधुनिकीकरण करावे'

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

Maharashtra Times 17 Aug 2017, 4:00 am
धुळे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers of the dhule district should modernize the agriculture
'जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे आधुनिकीकरण करावे'


२८६२६ शेतकऱ्यांना २४८ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, महापौर कल्पना महाले, सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक दिलीप माळी व प्रकाश पोतदार यांचा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात दि. २९ व ३० ऑगस्टला अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री भुसेंनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज