म. टा. वृत्तसेवा, धुळे
महावितरण कंपनीच्या कारभाराचा गुरूवारी (दि. १४) झालेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर जनतेकडून तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. त्यामुळे कामचुकार भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जनता दरबारात घाम थांबेना झाला होता. महावितरण कंपनीचे बहुतेक अधिकारी सरकारी पैशांवर डल्ला मारतात. तर कुटुंबासह कंपनीच्या वाहनावर भटकंतीला जातात, असे गैरप्रकार जिल्ह्यातील अधिकारी करीत असल्याचा आरोपही जनतेकडून मंत्री बावनकुळे यांच्याकडे करण्यात आले. त्याची तत्काळ दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी धुळे जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांना तडकाफडकी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभरात जनतेशी संवाद सादर असून, धुळ्यात गुरूवारी (दि. १४) शाहू नाट्यमंदिरात जनता दरबार घेण्यात आला. त्यावेळी जनतेने मंत्री बावनकुळे यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या तक्रारी खुलेपणाने सांगितल्या. त्यामध्ये शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या पावर हाऊसमध्ये अधिकारी व कर्मचारी एसी, पंखे, विद्युत दिवे अहोरात्र सुरूच ठेवतात. महावितरणचे काही अधिकारी अॅट्रॉसिटीची धमकी दाखवितात, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकूंद कोळवले यांनी यावेळी केला.
नवीन मीटर देणे, विद्युत पुरवठा बंद झाल्यावर त्वरित सुरू करणे, धोकादायक वीजतारांना ताण देणे यासह अन्य कामांना कर्मचारी हेतूपुरस्कर उशीर करतात. शहरालगत असलेल्या वलवाडी परिसरात तर रात्रंदिवस रस्त्यावरील पथदिवे सुरूच असतात मग विजेची बचत होते का, अशा तक्रारी नागरिकांकडून ऊर्जामंत्र्यांना करण्यात आल्या. मंत्री बावनकुळे यांनी यावर जे अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.
महावितरण कंपनीच्या कारभाराचा गुरूवारी (दि. १४) झालेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर जनतेकडून तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. त्यामुळे कामचुकार भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जनता दरबारात घाम थांबेना झाला होता. महावितरण कंपनीचे बहुतेक अधिकारी सरकारी पैशांवर डल्ला मारतात. तर कुटुंबासह कंपनीच्या वाहनावर भटकंतीला जातात, असे गैरप्रकार जिल्ह्यातील अधिकारी करीत असल्याचा आरोपही जनतेकडून मंत्री बावनकुळे यांच्याकडे करण्यात आले. त्याची तत्काळ दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी धुळे जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांना तडकाफडकी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभरात जनतेशी संवाद सादर असून, धुळ्यात गुरूवारी (दि. १४) शाहू नाट्यमंदिरात जनता दरबार घेण्यात आला. त्यावेळी जनतेने मंत्री बावनकुळे यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या तक्रारी खुलेपणाने सांगितल्या. त्यामध्ये शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या पावर हाऊसमध्ये अधिकारी व कर्मचारी एसी, पंखे, विद्युत दिवे अहोरात्र सुरूच ठेवतात. महावितरणचे काही अधिकारी अॅट्रॉसिटीची धमकी दाखवितात, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकूंद कोळवले यांनी यावेळी केला.
नवीन मीटर देणे, विद्युत पुरवठा बंद झाल्यावर त्वरित सुरू करणे, धोकादायक वीजतारांना ताण देणे यासह अन्य कामांना कर्मचारी हेतूपुरस्कर उशीर करतात. शहरालगत असलेल्या वलवाडी परिसरात तर रात्रंदिवस रस्त्यावरील पथदिवे सुरूच असतात मग विजेची बचत होते का, अशा तक्रारी नागरिकांकडून ऊर्जामंत्र्यांना करण्यात आल्या. मंत्री बावनकुळे यांनी यावर जे अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.