मटा ऑनलाइन वृत्त। धुळे
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुटका होऊन आपल्या मायदेशी परतलेला '३७ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच उद्या, शनिवारी धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी येणार आहे. आपला चंदू गावी येणार हे समजताच त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांना एखादा सण असल्यासारखे वाटत आहे. त्यांनी जवान चंदूच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जवान चंदू ज्या मार्गाने गावात प्रवेश करेल तो मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे औक्षणही करण्यात येणार आहे.
याबरोबर, बोरविहिर गावच्या महिला मंडळींनी जवान चंदूच्या आवडीच्या जेवणाचा खास बेत देखील आखला आहे.
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी जवान चंदू चव्हाण नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच गेला होता. चंदूला भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदूच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुटका होऊन आपल्या मायदेशी परतलेला '३७ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच उद्या, शनिवारी धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी येणार आहे. आपला चंदू गावी येणार हे समजताच त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांना एखादा सण असल्यासारखे वाटत आहे. त्यांनी जवान चंदूच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जवान चंदू ज्या मार्गाने गावात प्रवेश करेल तो मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे औक्षणही करण्यात येणार आहे.
याबरोबर, बोरविहिर गावच्या महिला मंडळींनी जवान चंदूच्या आवडीच्या जेवणाचा खास बेत देखील आखला आहे.
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी जवान चंदू चव्हाण नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच गेला होता. चंदूला भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदूच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.