म. टा. वृत्तसेवा, धुळे
'परताव्यासाठी एकजूट-न्यायासाठी वज्रमूठ', 'आता आम्ही थांबणार नाही, तोपर्यंत कष्टाचा पैसा मिळणार नाही', अशा घोषणा देत मैत्रेय कंपनीने विविध उपक्रमात गुंतविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा परत मिळाव्यात या मागणीसाठी सोमवारी (दि. १७) धुळे शहरात मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे मोर्चा काढण्यात आला.
पांझरा चौपाटीपासून हा पायी मोर्चा काढत मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सपकाळ यांच्यासह कंपनीच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. आणि ही आकडेवारी कोट्यवधीचे रुपयांमध्ये आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून गुंतवणूकदारांना कंपनीकडून कोणताही परतावा मिळालेला नाही. प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने अखेर मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व मैत्रेय ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप सिसोदे, नीलेश वाणी, गौतम महाजन यांनी केले.
'परताव्यासाठी एकजूट-न्यायासाठी वज्रमूठ', 'आता आम्ही थांबणार नाही, तोपर्यंत कष्टाचा पैसा मिळणार नाही', अशा घोषणा देत मैत्रेय कंपनीने विविध उपक्रमात गुंतविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा परत मिळाव्यात या मागणीसाठी सोमवारी (दि. १७) धुळे शहरात मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे मोर्चा काढण्यात आला.
पांझरा चौपाटीपासून हा पायी मोर्चा काढत मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सपकाळ यांच्यासह कंपनीच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. आणि ही आकडेवारी कोट्यवधीचे रुपयांमध्ये आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून गुंतवणूकदारांना कंपनीकडून कोणताही परतावा मिळालेला नाही. प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने अखेर मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व मैत्रेय ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप सिसोदे, नीलेश वाणी, गौतम महाजन यांनी केले.