अ‍ॅपशहर

धुळ्यात परतताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला

पाकिस्तानच्या तावडीतून सहिसलामत सुटलेला '३६ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण याने आपल्या धुळ्यातील बोरविहीर या गावी आज तब्बल नऊ महिन्यांनी परतला. बोरविहीर गावच्या भूमीत पाऊल ठेवताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला आणि चंदूला अश्रू अनावर झाले. स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिलांनी चंदूला पाहताच त्यांचेही डोळे पाणावले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील चंदूसोबत होते.

Maharashtra Times 11 Mar 2017, 9:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त। धुळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jawan chandu chavan reached his native in borvihir of dhule district in maharashtra
धुळ्यात परतताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला


पाकिस्तानच्या तावडीतून सहिसलामत सुटलेला '३६ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण याने आपल्या धुळ्यातील बोरविहीर या गावी आज तब्बल नऊ महिन्यांनी परतला. बोरविहीर गावच्या भूमीत पाऊल ठेवताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला आणि चंदूला अश्रू अनावर झाले. चंदूला पाहताच चंदूच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिलांचे डोळेही पाणावले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील चंदूसोबत होते.

धुळ्यात पोहोचताच चंदूचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र धुळ्यात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम चंदूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर तो बोरविहीर या आपल्या मूळ गावी रवाना झाला. बोरविहीर गावात पोहोचताच चंदूला आपल्या दिवंगत आजीची आठवण झाली. चंदूला पाकिस्तानने ताब्यात ठेवल्याचे कळताच चंदूच्या आजीचे धक्क्याने निधन झाले होते. जो पर्यंत चंदू परतत नाही, तो पर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही असे चंदूच्या भावाने म्हटले होते.

सर्जिकल स्ट्राइकनंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी चंदू नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज