म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन म्हणून आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात आहे. समान न्याय व संधी या मागणीसह विविध मागण्यासाठी दि. १५ मार्चपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा सोमवारी (दि. २०) सहावा दिवस होता. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन पुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. सी. राजपूत यांनी सांगितिले. यावेळी सी. जी. देवरे, नंदकिशोर चौधरी, सुशील सोनवणे, विरेंद्र सावळे, डी. एम. पाटील, प्रकाश बोरसे उपस्थित होते.
जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन म्हणून आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात आहे. समान न्याय व संधी या मागणीसह विविध मागण्यासाठी दि. १५ मार्चपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा सोमवारी (दि. २०) सहावा दिवस होता. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन पुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. सी. राजपूत यांनी सांगितिले. यावेळी सी. जी. देवरे, नंदकिशोर चौधरी, सुशील सोनवणे, विरेंद्र सावळे, डी. एम. पाटील, प्रकाश बोरसे उपस्थित होते.