साक्री तालुक्यातील मालनगाव धरणाबाबत शेतकऱ्यांसह समिती आक्रमक
म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शनिवारी (दि. २२) धरणालगतच्या गावातील शेतकऱ्यांसह मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने तीव्र विरोध केला. तसेच याविरोधात आंदोलन करण्याचा इशारादेखील या आंदोलकांनी प्रशासनासह सिंचन विभागाला दिला आहे.
मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पाठबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र, मालनगाव धरणाच्या लाभदायक क्षेत्रातील २५ गावातील शेतकऱ्यांनी या प्रस्तावास जोरदार विरोध दर्शवित मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीकडून आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात मालनगाव रोपवाटिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत साक्री शहराला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही. पण जलवाहिनी ऐवजी साक्री शहरासाठी आरक्षित पाणी कॅनलद्वारे किंवा नदीपात्रातून घेऊन जावे, अशी भूमिका घेण्यात आली. मालनगाव धरणातून थेट साक्रीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी घेऊ दिले जाणार नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंचन विभाग काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांसह संघर्ष समितीचे लक्ष लागले आहे.
समितीने धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी घेतल्यास परिसरातील व नदीपात्रालगत असणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी कमी होईल. परिणामी, दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही कोरड्या होतील. धरण बांधण्यासाठी ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्या त्यांच्याच तोंडाचे पाणी पळवण्याचा हा प्रकार आहे.
म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शनिवारी (दि. २२) धरणालगतच्या गावातील शेतकऱ्यांसह मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने तीव्र विरोध केला. तसेच याविरोधात आंदोलन करण्याचा इशारादेखील या आंदोलकांनी प्रशासनासह सिंचन विभागाला दिला आहे.
मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पाठबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र, मालनगाव धरणाच्या लाभदायक क्षेत्रातील २५ गावातील शेतकऱ्यांनी या प्रस्तावास जोरदार विरोध दर्शवित मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीकडून आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात मालनगाव रोपवाटिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत साक्री शहराला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही. पण जलवाहिनी ऐवजी साक्री शहरासाठी आरक्षित पाणी कॅनलद्वारे किंवा नदीपात्रातून घेऊन जावे, अशी भूमिका घेण्यात आली. मालनगाव धरणातून थेट साक्रीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी घेऊ दिले जाणार नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंचन विभाग काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांसह संघर्ष समितीचे लक्ष लागले आहे.
समितीने धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी घेतल्यास परिसरातील व नदीपात्रालगत असणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी कमी होईल. परिणामी, दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही कोरड्या होतील. धरण बांधण्यासाठी ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्या त्यांच्याच तोंडाचे पाणी पळवण्याचा हा प्रकार आहे.