केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची माहिती; नऊ हजार कोटी अपेक्षित
म. टा. वृत्तसेवा, धुळे
धुळे जिल्ह्याचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. ज्या रेल्वेमार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून थांबावे लागले आहे तो आता पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. या मार्गासाठी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची खर्च अपेक्षित असून, रेल्वेपोर्ट आणि जेएनपीटी यांच्या मदतीने हा मार्ग होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी (दि. २९) पत्रकारांशी बोलताना दिली.
याचबरोबर धुळे रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण आणि धुळे-पुणे हा प्रवास रेल्वेने आता करता येणार आहे याबद्दलही यावेळी माहिती देण्यात आली. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाविषयी लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भुसे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावित, खासदार ए. टी. पाटील, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आमदार अनिल गोटे तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने हा मार्ग पूर्ण होणारच
रेल्वे मंत्रालयाने दि. ३ जुलैला झालेल्या बैठकीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा संपूर्ण अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला दिला आहे. त्यावर अभ्यास करून पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतरच प्रत्यक्ष जमीन भूसंपादनाला सुरुवात केली जाणार असून, ज्यांच्या जमिनी रेल्वेमार्गासाठी अधिग्रहण केल्या जातील त्यांना भूसंपादनाचा दर हा नवीन भूसंपादन कायद्यानुसार देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. त्याविषयी धुळे, नंदुरबार, जळगाव येथील लोकप्रतिनिधींनादेखील कळविण्यात आले आहे. सर्वांच्या सहकार्याने हा मार्ग पूर्ण होणारच, असा विश्वासही रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिला.
भुसावळ ते मुंबई हा नवीन रेल्वेमार्ग लवरकच सुरु करण्यात येणार आहे. हा मार्ग भुसावळ-अमळनेर-शिंदखेडा-दोंडाईचा-नंदुरबार-सुरत- मुंबई असा असणार आहे. आणि यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा या रेल्वेमार्गामुळे होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच इतर कामांचे भूमिपूजन उद््घाटनावेळी भूमिपूजन करण्यात आले.
म. टा. वृत्तसेवा, धुळे
धुळे जिल्ह्याचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. ज्या रेल्वेमार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून थांबावे लागले आहे तो आता पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. या मार्गासाठी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची खर्च अपेक्षित असून, रेल्वेपोर्ट आणि जेएनपीटी यांच्या मदतीने हा मार्ग होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी (दि. २९) पत्रकारांशी बोलताना दिली.
याचबरोबर धुळे रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण आणि धुळे-पुणे हा प्रवास रेल्वेने आता करता येणार आहे याबद्दलही यावेळी माहिती देण्यात आली. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाविषयी लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भुसे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावित, खासदार ए. टी. पाटील, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आमदार अनिल गोटे तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने हा मार्ग पूर्ण होणारच
रेल्वे मंत्रालयाने दि. ३ जुलैला झालेल्या बैठकीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा संपूर्ण अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला दिला आहे. त्यावर अभ्यास करून पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतरच प्रत्यक्ष जमीन भूसंपादनाला सुरुवात केली जाणार असून, ज्यांच्या जमिनी रेल्वेमार्गासाठी अधिग्रहण केल्या जातील त्यांना भूसंपादनाचा दर हा नवीन भूसंपादन कायद्यानुसार देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. त्याविषयी धुळे, नंदुरबार, जळगाव येथील लोकप्रतिनिधींनादेखील कळविण्यात आले आहे. सर्वांच्या सहकार्याने हा मार्ग पूर्ण होणारच, असा विश्वासही रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिला.
भुसावळ ते मुंबई हा नवीन रेल्वेमार्ग लवरकच सुरु करण्यात येणार आहे. हा मार्ग भुसावळ-अमळनेर-शिंदखेडा-दोंडाईचा-नंदुरबार-सुरत- मुंबई असा असणार आहे. आणि यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा या रेल्वेमार्गामुळे होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच इतर कामांचे भूमिपूजन उद््घाटनावेळी भूमिपूजन करण्यात आले.