कायदेशीर प्रक्रिया करून समाजापुढे ठेवला आदर्श
म. टा. वृत्तसेवा, धुळे
शहरातील वेदांत मंगल भवनात एक विवाह समारंभ होता. परंतु, या समारंभात अतिशय अचंबित करणारा आगळावेगळा प्रकार घडल्याने त्याची चर्चा संपूर्ण धुळे शहरासह जिल्हाभरात झाली. हा प्रकार म्हणजे हुंडा मागणी, वऱ्हाडाचे रुसवे फुगवे, मानापमान नाट्य असे काहीही नव्हते. तर विवाह मंडपात नवदाम्पत्याने मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तताही केली. नवदाम्पत्याने जाहीर केलेल्या या निर्णयाने सर्वजण अचंबित झाले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदाम्पत्याच्या या डोळस निर्णयाने समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
सार्वजनिक क्षेत्रात काम करताना माणसाने सामाजिक दृष्टीकोन समोर ठेऊन इतके काम करावे की, ते किर्तीरूपाने सर्वांना परिचित राहावे, अशी अपेक्षा राहते. यामुळे व्यक्तिगत पातळीवर किर्तीरूपी काम करण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत. असेच सामाजिक काम शहरातील भाग्यश्री टाकणे या तरुणीने पतीसह नेत्रदानाचा संकल्प केला आहे. कारण भाग्यश्रीच्या वडिलांना गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यांची समस्या होती. आपले डोळे मरणानंतर कोणाच्यातरी कामात येऊन एखाद्याला दृष्टी मिळेल, असा विश्वास तिला असल्याने नेत्रदान करत असल्याची माहिती भाग्यश्रीने दिली.
म. टा. वृत्तसेवा, धुळे
शहरातील वेदांत मंगल भवनात एक विवाह समारंभ होता. परंतु, या समारंभात अतिशय अचंबित करणारा आगळावेगळा प्रकार घडल्याने त्याची चर्चा संपूर्ण धुळे शहरासह जिल्हाभरात झाली. हा प्रकार म्हणजे हुंडा मागणी, वऱ्हाडाचे रुसवे फुगवे, मानापमान नाट्य असे काहीही नव्हते. तर विवाह मंडपात नवदाम्पत्याने मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तताही केली. नवदाम्पत्याने जाहीर केलेल्या या निर्णयाने सर्वजण अचंबित झाले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदाम्पत्याच्या या डोळस निर्णयाने समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
सार्वजनिक क्षेत्रात काम करताना माणसाने सामाजिक दृष्टीकोन समोर ठेऊन इतके काम करावे की, ते किर्तीरूपाने सर्वांना परिचित राहावे, अशी अपेक्षा राहते. यामुळे व्यक्तिगत पातळीवर किर्तीरूपी काम करण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत. असेच सामाजिक काम शहरातील भाग्यश्री टाकणे या तरुणीने पतीसह नेत्रदानाचा संकल्प केला आहे. कारण भाग्यश्रीच्या वडिलांना गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यांची समस्या होती. आपले डोळे मरणानंतर कोणाच्यातरी कामात येऊन एखाद्याला दृष्टी मिळेल, असा विश्वास तिला असल्याने नेत्रदान करत असल्याची माहिती भाग्यश्रीने दिली.