धुळे :
देशासह महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री सिंचाई कृषी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत देशभरातील ९९ प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे तीन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बळिराजा जलसंजिवनी योजनेंतर्गत २४०७.६७ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा योजनेचे भूमिपूजन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत निम्न पांझरा मध्यम प्रकल्पाचा (अक्कलपाडा) लोकार्पण सोहळा, धुळे- नरडाणा नवीन रेल्वे मार्ग व जळगाव- मनमाड तिसरा रेल्वे मार्गाचे भूमिपूजन, धुळे महानगरपालिकेसाठी भारत सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत अक्कलपाडा धरणापासून धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक एकचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भुसावळ-वांद्रे टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या खान्देश एक्स्प्रेस, उधना-नंदुरबार व उधना- पाळधी मेमू ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन, दळणवळण, नदी विकासमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार रावसाहेब दानवे, ए. टी. पाटील, डॉ. हीना गावित, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार एकनाथ खडसे, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते.
धुळे शहरात नवे औद्योगिक शहर वसविण्याची क्षमता आहे. आगामी ३० वर्षांत धुळे शहर हे सूरत शहराशी स्पर्धा करेल. नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या दळणवळण सुविधेमुळे शहराचा वेगाने विकास होऊ शकेल. त्यासाठी धुळेकर नागरिकांबरोबर आपण आहोत, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, धुळे-नरडाणा हा रेल्वे मार्ग मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला जोडणारा आहे. ९ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. त्याचा मुंबईसह देशालाही लाभ होईल. तसेच जळगाव-मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळून रोजगाराची निर्मिती होईल. उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरणामुळे व्यापार वाढेल. तसेच मुंबई-कोलकाता दरम्यान १५० किलोमीटर अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांनाही हा मार्ग सोयीचा होणार आहे.
अहिराणीतून केली भाषणाची सुरुवात
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्थानिक बोलीभाषा अहिराणीतून केली. ‘आठे जमेल खान्देशना तमाम भाऊ- बहिनीसले मना मन:पूर्वक नमस्कार. तुमी इतला लोके, माले आशीर्वाद देवाले उनात. मी तुमना आभारी शे. खान्देशना लोकेसना जिव्हाळाना प्रकल्प मा मी सहभागी व्हयनू येना माले आनंद शे.’’, असे म्हणत मोदी यांनी धुळेकर नागरिकांची मने जिंकली.
देशासह महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री सिंचाई कृषी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत देशभरातील ९९ प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे तीन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बळिराजा जलसंजिवनी योजनेंतर्गत २४०७.६७ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा योजनेचे भूमिपूजन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत निम्न पांझरा मध्यम प्रकल्पाचा (अक्कलपाडा) लोकार्पण सोहळा, धुळे- नरडाणा नवीन रेल्वे मार्ग व जळगाव- मनमाड तिसरा रेल्वे मार्गाचे भूमिपूजन, धुळे महानगरपालिकेसाठी भारत सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत अक्कलपाडा धरणापासून धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक एकचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भुसावळ-वांद्रे टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या खान्देश एक्स्प्रेस, उधना-नंदुरबार व उधना- पाळधी मेमू ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन, दळणवळण, नदी विकासमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार रावसाहेब दानवे, ए. टी. पाटील, डॉ. हीना गावित, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार एकनाथ खडसे, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते.
धुळे शहरात नवे औद्योगिक शहर वसविण्याची क्षमता आहे. आगामी ३० वर्षांत धुळे शहर हे सूरत शहराशी स्पर्धा करेल. नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या दळणवळण सुविधेमुळे शहराचा वेगाने विकास होऊ शकेल. त्यासाठी धुळेकर नागरिकांबरोबर आपण आहोत, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, धुळे-नरडाणा हा रेल्वे मार्ग मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला जोडणारा आहे. ९ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. त्याचा मुंबईसह देशालाही लाभ होईल. तसेच जळगाव-मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळून रोजगाराची निर्मिती होईल. उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरणामुळे व्यापार वाढेल. तसेच मुंबई-कोलकाता दरम्यान १५० किलोमीटर अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांनाही हा मार्ग सोयीचा होणार आहे.
अहिराणीतून केली भाषणाची सुरुवात
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्थानिक बोलीभाषा अहिराणीतून केली. ‘आठे जमेल खान्देशना तमाम भाऊ- बहिनीसले मना मन:पूर्वक नमस्कार. तुमी इतला लोके, माले आशीर्वाद देवाले उनात. मी तुमना आभारी शे. खान्देशना लोकेसना जिव्हाळाना प्रकल्प मा मी सहभागी व्हयनू येना माले आनंद शे.’’, असे म्हणत मोदी यांनी धुळेकर नागरिकांची मने जिंकली.