अ‍ॅपशहर

संघर्षयात्रा म्हणजे प्रस्थापितांचे ढोंग

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशांवर उभे राहिलेल्या सहकारी संस्था उद्ध्वस्त करून खासगी प्रतिष्ठाने उभी करणाऱ्या सत्तेच्या ठेकेदारांना सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. त्यांची ही संघर्षयात्रा म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे पत्रक माजी आमदार प्रा. शरद पाटील व भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजय शर्मा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Maharashtra Times 17 Apr 2017, 4:00 am
प्रा.शरद पाटील, संजय शर्मा यांचे पत्रक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sangharsayatra is pretend ofopposition parties
संघर्षयात्रा म्हणजे प्रस्थापितांचे ढोंग


म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशांवर उभे राहिलेल्या सहकारी संस्था उद्ध्वस्त करून खासगी प्रतिष्ठाने उभी करणाऱ्या सत्तेच्या ठेकेदारांना सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. त्यांची ही संघर्षयात्रा म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे पत्रक माजी आमदार प्रा. शरद पाटील व भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजय शर्मा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून या पत्रकात त्यांनी अकरा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात धुळे तालुक्यासह जिल्ह्यात बंद पडलेले सहकारी उद्योग, शिंदखेडा सहकारी, संजय सहकारी, पांझराकान सहकारी कारखान्यांचा व सूतगिरण्यांच्या उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा बँकेतून कॉटन फोल्डरच्या नावाने दिलेले गेलेले 90 कोटीचे कर्ज, जिल्हा बँकेचे जळीत प्रकरण, जिल्हा परिषदेत वीस वर्षांत भास्कर वाघाने केलेला अपहार, त्यातील लाभार्थी नेते, एकाधिकार तूर खरेदी केंद्रावर बाजार समितीच्या कोणत्या संचालकांना फायदा झाला याची नावे जाहीर करावीत अशा ११ प्रश्नांचा या पत्रकात समावेश आहे. संघर्षयात्रा शेतकऱ्यांप्रती कळवळा

दाखवून काढलेल्या संघर्षयात्रेच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असेही प्रा. पाटील व शर्मा यांनी पत्रकात नमूद केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज