रमजान बाबा नगरमधील दीडशे कुटुंब उघड्यावर
म. टा. वृत्तसेवा, धुळे
शहरातील नटराज टॉकीज परिसरातील रमजान बाबा नगरमध्ये बुधवारी (दि. १) पहाटे चार घरांना शॉट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत अकरा घरे जळाली असून त्यातील रहिवाशांच्या लग्नासाठी जमा केलेल्या तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत.
या भीषण आगीत एकूण दीडशे ते दोनशे जणांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. घरातील साहित्यासह संसारोपयोगी वस्तूदेखील जळाल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन बंब उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिक संतप्त झाले होते. ही आग विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लागली असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रमजान बाबा नगरात पहाटेच्या सुमारास घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीने चार घरांना वेढले. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली मात्र बंब वेळेत न पोहचल्याने लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते.
तीन लाखांच्या नोटा खाक
या आगीत लग्नासाठी जमा केलेल्या अडीच लाखांच्या रोकडसह एकूण तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असून ते सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. बेघर अकरा कुटुंबियांनी तात्पुरता मोकळ्या जागेवरच राहण्याची व्यवस्था केली आहे.
म. टा. वृत्तसेवा, धुळे
शहरातील नटराज टॉकीज परिसरातील रमजान बाबा नगरमध्ये बुधवारी (दि. १) पहाटे चार घरांना शॉट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत अकरा घरे जळाली असून त्यातील रहिवाशांच्या लग्नासाठी जमा केलेल्या तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत.
या भीषण आगीत एकूण दीडशे ते दोनशे जणांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. घरातील साहित्यासह संसारोपयोगी वस्तूदेखील जळाल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन बंब उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिक संतप्त झाले होते. ही आग विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लागली असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रमजान बाबा नगरात पहाटेच्या सुमारास घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीने चार घरांना वेढले. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली मात्र बंब वेळेत न पोहचल्याने लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते.
तीन लाखांच्या नोटा खाक
या आगीत लग्नासाठी जमा केलेल्या अडीच लाखांच्या रोकडसह एकूण तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असून ते सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. बेघर अकरा कुटुंबियांनी तात्पुरता मोकळ्या जागेवरच राहण्याची व्यवस्था केली आहे.