पाकचे आश्वासन; संरक्षण राज्यमंत्र्यांची ग्वाही
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अनवधानाने ओलांडल्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडलेले धुळ्याचे २२ वर्षांचे जवान चंदू चव्हाण यांची लवकरच सुटका होणार आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. पाकच्या लष्करी कारवायाविषयक महासंचालकांनीच (डीजीएमओ) हे आश्वासन दिले असून, पाककडून प्रथमच ठोसपणे सूतोवाच झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
धुळ्याच्या बोरविहीर गावचे चंदू चव्हाण चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले. ‘३७, राष्ट्रीय रायफल्स’मध्ये असलेले चंदू चव्हाण ३० सप्टेंबर रोजी सीमेवर गस्त घालताना पाक सैनिकांच्या तावडीत सापडले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय हवालदील आहेत. मात्र, चंदू चव्हाण यांच्या जीविताला धोका नसल्याचे पाकने आश्वस्त केल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.
डीजीएमओ स्तरावर आतापर्यंत पाकशी १५ ते २०वेळा चर्चा झाली. परंतु, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत पाकने चव्हाण यांच्याविषयी ठोस आश्वासन दिले आहे. ‘भारतीय जवानाची चौकशी संपली असून, आम्ही त्याला लवकरच सोडू’, अशी ग्वाही पाक अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे भामरे यांनी सांगितले.
दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने निकृष्ट जेवणाबद्दल केलेल्या तक्रारीसारखी कोणतीही तक्रार आपल्याकडे लष्कर, हवाई दल किंवा नौदलाकडून आलेली नाही. सीमा सुरक्षा दलाच्या तक्रारीविषयीही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशी केली आहे व त्यानुसार उत्तर दिले आहे, असे भामरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अनवधानाने ओलांडल्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडलेले धुळ्याचे २२ वर्षांचे जवान चंदू चव्हाण यांची लवकरच सुटका होणार आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. पाकच्या लष्करी कारवायाविषयक महासंचालकांनीच (डीजीएमओ) हे आश्वासन दिले असून, पाककडून प्रथमच ठोसपणे सूतोवाच झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
धुळ्याच्या बोरविहीर गावचे चंदू चव्हाण चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले. ‘३७, राष्ट्रीय रायफल्स’मध्ये असलेले चंदू चव्हाण ३० सप्टेंबर रोजी सीमेवर गस्त घालताना पाक सैनिकांच्या तावडीत सापडले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय हवालदील आहेत. मात्र, चंदू चव्हाण यांच्या जीविताला धोका नसल्याचे पाकने आश्वस्त केल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.
डीजीएमओ स्तरावर आतापर्यंत पाकशी १५ ते २०वेळा चर्चा झाली. परंतु, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत पाकने चव्हाण यांच्याविषयी ठोस आश्वासन दिले आहे. ‘भारतीय जवानाची चौकशी संपली असून, आम्ही त्याला लवकरच सोडू’, अशी ग्वाही पाक अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे भामरे यांनी सांगितले.
दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने निकृष्ट जेवणाबद्दल केलेल्या तक्रारीसारखी कोणतीही तक्रार आपल्याकडे लष्कर, हवाई दल किंवा नौदलाकडून आलेली नाही. सीमा सुरक्षा दलाच्या तक्रारीविषयीही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशी केली आहे व त्यानुसार उत्तर दिले आहे, असे भामरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.