धुळे : शेतकऱ्यांच्या कृषी मालाला रास्त भाव मिळावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत धुळ्याजवळील देवभाने गावाजवळ गुरुवारी (दि. १) कृषी मालाची आवक-जावक रोखली. यावेळी नाशवंत दुध परत पाठविणे शक्य नसल्याने ते रस्त्यावर ओतून देण्यात आले. तर वाहने भाजीपाला व इतर भुसार माल वाहून नेणारे अडवून ते तपासण्यात आले. यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने गावाजवळ वाहतूक काही ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे धुळे जिल्ह्यातून मुंबई, पुणे, नाशिक या शहरांकडे जाणारी व तेथून मध्यप्रदेश व गुजरात राज्यात शेतीमाल घेऊन जाणारी वाहने शेतकऱ्यांनी थांबविली होते. आंदोलनात आत्माराम पाटील, शांतीलाल पटेल, भावेश पाटील, छगन पाटील, भगवान पाटील, अरुण पाटील, दीपक काटे यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. मुंबई, नाशिक कडे जाणाऱ्या कांदा, बटाटा आणि दुधाचा ट्रक या शेतकऱ्यांनी अडवला तसेच देवभाने व कापडणे येथील शेतकऱ्यांनी बाजार समितीत जाणारे कांद्याचे ट्रॅक्टर अडवून रास्ता रोकोला सुरुवात केली. धुळे तालुक्याप्रमाणेच साक्री तालुका, सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेच्या शेतकऱ्यांनीदेखील संपाला पाठिंबा दिला होता.
बाजार समितीत व्यवहार संथ
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ४८० क्विंटल भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. तर गुरुवारी ३८० क्विंटल भाजीपाल्याची खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. तर धान्य व भुसार मालाची आवक ७११ क्विंटलचा व्यवहार झाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यातून वसूधरा डेअरी मध्ये दररोज एक लाख लीटर दूध संकलित केले जाते मात्र शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्याच दिवशी फक्त १२ हजार दूध संकलित झाले असल्याचे सांगण्यात आले.
नंदुरबार बाजार समितीत शुकशुकाट
शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणवू लागला आहे. गुरुवारी, सकाळपासून बाजार समितीत धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आपला माल आणला नव्हता. सकाळी ९ पर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी आले नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट होता. या संपाचा परिणाम शेजारील गुजरात राज्यामध्येही जाणवू शकतो. गुजरातची परसबाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. जर दुपारी शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला बाजारात आणला नाही. तर गुजरात राज्यातील सुरत, बडोदा या बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
बाजार समितीत व्यवहार संथ
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ४८० क्विंटल भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. तर गुरुवारी ३८० क्विंटल भाजीपाल्याची खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. तर धान्य व भुसार मालाची आवक ७११ क्विंटलचा व्यवहार झाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यातून वसूधरा डेअरी मध्ये दररोज एक लाख लीटर दूध संकलित केले जाते मात्र शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्याच दिवशी फक्त १२ हजार दूध संकलित झाले असल्याचे सांगण्यात आले.
नंदुरबार बाजार समितीत शुकशुकाट
शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणवू लागला आहे. गुरुवारी, सकाळपासून बाजार समितीत धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आपला माल आणला नव्हता. सकाळी ९ पर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी आले नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट होता. या संपाचा परिणाम शेजारील गुजरात राज्यामध्येही जाणवू शकतो. गुजरातची परसबाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. जर दुपारी शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला बाजारात आणला नाही. तर गुजरात राज्यातील सुरत, बडोदा या बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.