तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची मागणी
म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्ह्यातील सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब समोर आली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील रस्त्याचा भराव वाहू लागल्याने महामार्ग खचला आहे. यामुळे महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळून जाणाऱ्या भरावाच्या मातीचे पावसानंतर खचले आहे. धरणाजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या भरावाच्या कामात इतका कामचुकारपणा असेल तर धरणालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्कलपाडा धरणाला लागून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम सुरू आहे.
अक्कलपाडा धरणालाही धोका
गेल्यावर्षी अक्कलपाडा धरणात ९८ टक्के जलसाठा झाल्यानंतर आता या धरणासाठी वाढीव जमीन संपादित करण्यात येत आहे. त्यामुळे हा महामार्ग थेट अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या मध्यातून जाणार आहे. त्यासाठी किमान अक्कलपाडा प्रकल्पातून जाणाऱ्या महामार्गाचे काम तेवढेच व्हायला पाहिजे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाबरोबरच महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीने सक्षमीकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे पहिल्याच पावसानंतर महामार्ग खचून गेला. धुळे व साक्री तालुक्यातील नेर, कुसुंब, तामसवाडी, वसमार, अक्कलपाडा आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. अद्याप पाऊस कमी असला तरीदेखील मुसळधार पाऊस झाला तर महामार्ग पूर्ण खचल्याशिवाय राहणार नाही. यामुळे या महामार्गाची तज्ज्ञांकडून तपासणी करून चौकशीअंती संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्ह्यातील सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब समोर आली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील रस्त्याचा भराव वाहू लागल्याने महामार्ग खचला आहे. यामुळे महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळून जाणाऱ्या भरावाच्या मातीचे पावसानंतर खचले आहे. धरणाजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या भरावाच्या कामात इतका कामचुकारपणा असेल तर धरणालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्कलपाडा धरणाला लागून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम सुरू आहे.
अक्कलपाडा धरणालाही धोका
गेल्यावर्षी अक्कलपाडा धरणात ९८ टक्के जलसाठा झाल्यानंतर आता या धरणासाठी वाढीव जमीन संपादित करण्यात येत आहे. त्यामुळे हा महामार्ग थेट अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या मध्यातून जाणार आहे. त्यासाठी किमान अक्कलपाडा प्रकल्पातून जाणाऱ्या महामार्गाचे काम तेवढेच व्हायला पाहिजे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाबरोबरच महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीने सक्षमीकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे पहिल्याच पावसानंतर महामार्ग खचून गेला. धुळे व साक्री तालुक्यातील नेर, कुसुंब, तामसवाडी, वसमार, अक्कलपाडा आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. अद्याप पाऊस कमी असला तरीदेखील मुसळधार पाऊस झाला तर महामार्ग पूर्ण खचल्याशिवाय राहणार नाही. यामुळे या महामार्गाची तज्ज्ञांकडून तपासणी करून चौकशीअंती संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.