गडचिरोली : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल कोश्यारी यांनी काल गडचिरोली जिल्हयात पोहचल्यावर ते चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरु असलेले काम त्यांनी जाणून घेतले.
डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही केली. तसेच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्णांसोबतही राज्यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी डॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून विविध उपक्रमशील मनांना प्रेरणा मिळते अशी प्रतिक्रिया नोंदवली. दारूबंदी व तंबाखूबंदीचे काम कठीण आहे, ते सातत्त्याने केले पहिजे. या पार्श्वभूमीवर सर्च संस्थेद्वारा गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू बंदीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, सिगारेट व बिडी पिण्याचे प्रमाण अनेक ठिकाणी कमी झाले आहे. उपदेश देणे सोपे आहे पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण आहे, ही खरोखरच एक साधना आहे. ती तुम्ही निष्ठेने करत आहात अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
गोंडवाना विद्यापीठाचा आज नववा दीक्षान्त समारंभ, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उपस्थिती
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठ परिसरात नव्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भगतसिंग कोश्यारी राहणार आहेत. दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग भारत सरकार चे अध्यक्ष हर्ष चव्हाण राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम,( सार्वजनिक उपक्रम मंत्री ) तथा जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी प्र-कुलगुरू श्रीराम कावडे उपस्थित राहतील.
या समारंभात एकूण गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी २८५, प्रथम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी ७७, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी ३६, आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४७ आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा २१, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ३, मानव विज्ञान विद्याशाखा १४, आंतर विज्ञान विद्या शाखा ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सत्रात १९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये १४ हजार ५०३ पदवी, ५ हजार २८६ पदव्युत्तर व २६ पदवीधारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या दीक्षांत समारंभाचा लाभ दूरदृष्य प्रणालीद्वारे घेता येणार आहे.
डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही केली. तसेच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्णांसोबतही राज्यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी डॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून विविध उपक्रमशील मनांना प्रेरणा मिळते अशी प्रतिक्रिया नोंदवली. दारूबंदी व तंबाखूबंदीचे काम कठीण आहे, ते सातत्त्याने केले पहिजे. या पार्श्वभूमीवर सर्च संस्थेद्वारा गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू बंदीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, सिगारेट व बिडी पिण्याचे प्रमाण अनेक ठिकाणी कमी झाले आहे. उपदेश देणे सोपे आहे पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण आहे, ही खरोखरच एक साधना आहे. ती तुम्ही निष्ठेने करत आहात अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
गोंडवाना विद्यापीठाचा आज नववा दीक्षान्त समारंभ, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उपस्थिती
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठ परिसरात नव्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भगतसिंग कोश्यारी राहणार आहेत. दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग भारत सरकार चे अध्यक्ष हर्ष चव्हाण राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम,( सार्वजनिक उपक्रम मंत्री ) तथा जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी प्र-कुलगुरू श्रीराम कावडे उपस्थित राहतील.
या समारंभात एकूण गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी २८५, प्रथम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी ७७, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी ३६, आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४७ आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा २१, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ३, मानव विज्ञान विद्याशाखा १४, आंतर विज्ञान विद्या शाखा ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सत्रात १९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये १४ हजार ५०३ पदवी, ५ हजार २८६ पदव्युत्तर व २६ पदवीधारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या दीक्षांत समारंभाचा लाभ दूरदृष्य प्रणालीद्वारे घेता येणार आहे.