अ‍ॅपशहर

केव्हा थांबणार हा धोक्याचा प्रवास? नागरिकांना नदी पत्रातून करावा लागतोय प्रवास

गडचिरोली जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना हा सोयीस्कर मार्ग आहे. दिना नदीवर पूल उभारल्यास ११२ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ६८ किलोमीटरवर येणार आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2021, 10:36 am
गडचिरोलीः जिल्ह्यात विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने आदिवासींना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही ही परिस्थिती कायमच आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी ते एटापल्ली दरम्यान असलेल्या रेगडी आणि देवदा या मार्गावर अडसर बनून असलेल्या देवदा जवळील दिना नदीवरच्या पुलाचा प्रश्न अजूनही कायमच आहे. या नदीवर पूल नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadchiroli


गडचिरोली जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना हा सोयीस्कर मार्ग आहे. दिना नदीवर पूल उभारल्यास ११२ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ६८ किलोमीटरवर येणार आहे. आष्टी अल्लापल्ली मार्गे एटापल्ली असा ११२ किलोमीटरचा प्रवास सध्या करावा लागत असल्याने वाहनधारकांना अंदाजे ४४ किलोमीटर जास्तीचा प्रवास करावा लागत आहे. त्यातुन सर्वांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना इतर ऋतूमध्ये वाहनधारकांना परवडण्यासारखा असल्याने वाहनधारक या मार्गाचा अवलंब करतात. मात्र पावसाळ्यात या नदीवर पूल नसल्याने जीव मुठीत घेऊन पाण्याचा प्रवाहातून मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे.

वाचाः मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहून

जिल्हा निर्मितीला ४० वर्ष पूर्ण होऊनही जिल्ह्यातील काही भाग अद्याप रस्ते व पूल विकासात मागे आहे. त्यापैकी चामोर्शी व घोट एटापल्ली या मार्गाचा समावेश आहे. या ६८ किलोमीटरच्या मार्गावर जवळपास १५ गावे येतात. एटापल्लीकडून गडचिरोली जिल्हा मुख्यालयात जाणारे वाहनधारक जवळचा मार्ग म्हणून घोट-पोटेगाव मार्गाने जातात.मात्र,या मार्गावरील दीना नदीवर पूल बनविण्याकडे अद्याप कोणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाचाः मराठवाड्यात पावसाचे थैमान; नदीच्या पाण्यात १७ जण अडकले

महत्वाचे लेख