अ‍ॅपशहर

खळबळजनक! ५० शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे मागितली नक्षलवादी होण्याची परवानगी

शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी मागितली आहे. तहसीलदार यांचे मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

Maharashtra Times 24 Nov 2021, 2:59 pm
हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी मागितली आहे. तहसीलदार यांचे मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav Thackeray (2)
खळबळजनक! ५० शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे मागितली नक्षलवादी होण्याची परवानगी


या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की यावर्षी झालेल्या पावसाने शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाला आहे. शेतातील सोयाबीन, तूर, कापूस, उडीद,मूग ई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे आता रब्बी हंगाम हा महावितरणच्या आडमुठे धोरणामुळे जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. कारण पिके ऐन मोसमात असताना महावितरणकडून शेतकरी यांची शेतातील वीज तोडणी करण्यात येत आहे.

वडिल जेलमध्ये असतानाही लेकींनी विजय खेचून आणला, सातारा जिल्हा बँक निवडणुकीची राज्यभर चर्चा
शेतकरी अर्धी बिले भरण्यासाठी तयार असूनसुद्धा महावितरणचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे. एकीकडे सरकारने शेतकऱ्यांना उजव्या हाताने मदत दिली, तिकडे मात्र बिल वसुलीच्या नावाखाली डाव्या हाताने जात असल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडत आहे. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागितल्याने खळबळ उडाली आहे. या निवेदनावर गावातील पन्नासच्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज