अ‍ॅपशहर

लसीकरणाची सक्ती तात्काळ मागे घ्या, हिंगोलीत किसान ब्रिगेडची मागणी!

कोरोनाची तिसरी लाट देशासह महाराष्ट्रात आलेली असताना कोरोना लसीकरणाने पुन्हा वेग घेतला आहे. लसीकरणाचा हाच वेग आणखी वाढावा, यासाठी शासन प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 17 Jan 2022, 4:14 pm
हिंगोली : कोरोनाची तिसरी लाट देशासह महाराष्ट्रात आलेली असताना कोरोना लसीकरणाने पुन्हा वेग घेतला आहे. लसीकरणाचा हाच वेग आणखी वाढावा, यासाठी शासन प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र असं असलं तरी काही लोकांना लसीकरणाची सक्ती मान्य नाही. आज हिंगोलीत लसीकरणाची सक्ती मागे घ्या, या मागणीसाठी किसान ब्रिगेडने आंदोलन केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Forced vaccination Should revoke decision demanding kisan Brigade


कोरोना हे षडयंत्र असून लसीकरणाची शक्ती नियमबाह्य असल्याची भूमिका घेत आज हिंगोली येथे किसान ब्रिगेडच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी किसान ब्रिगेडचे दादाराव शिंदे, विराट मंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्यासह अन्य लोकांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडलं.

आंदोलनस्थळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिलं. यात असे म्हटले आहे की, "जगातील प्रमुख शास्त्रज्ञ व डॉक्टर लसीकरण थांबविण्याचे आवाहन करीत आहेत. या कसोटीच्या काळात सर्वांनी मानवजातीला वाचविण्यासाठी आपली भूमिका बजावावी".

"शासनाने तात्काळ लसीकरणाची सक्ती मागे घ्यावी आणि लसीकरण प्रमाणपत्रा अभावी मिळणाऱ्या सुविधा बंद करण्यात आल्याने त्या तात्काळ सुरू करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे."

"नागरिकांनी घेतलेल्या व्हॅक्सिनच्या दुष्परिणामाची जबाबदारी कुणीही घेत नाहीये, त्यामुळे हे व्हॅक्सिन का घ्यावे....? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी केला आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

महत्वाचे लेख