हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथील देवकृपा विद्यालयातील लिपिकाचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी गुरुवारी (१९ मे) रात्री थेट आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणात भाजपाच्या नेत्यासोबत संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांची देवकृपा विद्यालय ही संस्था सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे आहे. या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील पांढुरणा येथील यु. सी. काईट हे लिपिक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, आज काईट यांचा पांढुरणा येथे मृत्यू झाला. त्यांनी संस्थेच्या पदाधिकार्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा -मुलीच्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसात शेतकरी वडिलांची आत्महत्या
या प्रकरणात संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये आणला. रात्री उशिरा मृतदेह पोलीस ठाण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले बालाजी पुंड यांच्या पथकाने मृत काईट यांच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती.
मृताजवळ आढळली चिठ्ठी
मृत यु.सी. काईट यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये 'माझ्या आत्महत्येस रामराव, दिलीप, शशिकांत वडकुते जबाबदार असून त्यांना शिक्षा झाली, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या मुलांना त्यांनी संस्थेवरून काढून टाकले त्यांना न्याय मिळाला असे समजा', असे या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता चिठ्ठीतील माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकारामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -पत्नीविरह सहन होईना, पत्नीच्या दुसर्या लग्नाच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या
'हा मला बदनाम करण्याचा कट' - रामराव वडकुते, भाजप जिल्हाध्यक्ष
या प्रकारामध्ये आपणाला विनाकारण बदनाम करण्याचा कट आहे. वास्तविक काईट हे हत्ता येथील शाळेवर होते. स्वतःचा त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता. त्यामुळे त्यांच्या मृत्यू प्रकारावरून आपणाला विनाकारण बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. चिठ्ठी प्रकरणाची पोलीस चौकशी होईलच, असं हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते हे म्हणाले.
हेही वाचा -मुलीच्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसात शेतकरी वडिलांची आत्महत्या
या प्रकरणात संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये आणला. रात्री उशिरा मृतदेह पोलीस ठाण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले बालाजी पुंड यांच्या पथकाने मृत काईट यांच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती.
मृताजवळ आढळली चिठ्ठी
मृत यु.सी. काईट यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये 'माझ्या आत्महत्येस रामराव, दिलीप, शशिकांत वडकुते जबाबदार असून त्यांना शिक्षा झाली, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या मुलांना त्यांनी संस्थेवरून काढून टाकले त्यांना न्याय मिळाला असे समजा', असे या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता चिठ्ठीतील माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकारामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -पत्नीविरह सहन होईना, पत्नीच्या दुसर्या लग्नाच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या
'हा मला बदनाम करण्याचा कट' - रामराव वडकुते, भाजप जिल्हाध्यक्ष
या प्रकारामध्ये आपणाला विनाकारण बदनाम करण्याचा कट आहे. वास्तविक काईट हे हत्ता येथील शाळेवर होते. स्वतःचा त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता. त्यामुळे त्यांच्या मृत्यू प्रकारावरून आपणाला विनाकारण बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. चिठ्ठी प्रकरणाची पोलीस चौकशी होईलच, असं हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते हे म्हणाले.