अ‍ॅपशहर

हिंगोलीत 'मुन्नाभाई'ने सुरु केलं क्लिनिक, वैद्यकीय पदवी पाहून आरोग्य विभागही हैराण

'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात अभिनेता संजय दत्तला ज्या पद्धतीने डॉक्टर होताना दाखवलं असा प्रकार खऱ्या आयुष्यात घडला तर? पण हिंगोलीत याहूनही भयंकर प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह आरोग्य विभाग हादरलं आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2022, 1:40 pm
हिंगोली : 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात अभिनेता संजय दत्त याने ज्याप्रकारे डॉक्टरची पदवी मिळवली ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. पण याचाच एक धक्कादायक प्रकार हिंगोलीमध्ये समोर आला आहे. इथं तीन बोगस डॉक्टरांनी चांगलाच धिंगाणा घातला आहे. खरंतर, हिंगोलीतल्या वसमत तालुक्यांमध्ये बोगस बंगाली डॉक्टरांनी हौदोस घातला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hingoli news toady
hingoli news toady


अनेक बोगस डॉक्टर कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना सर्रास राजरोसपणे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या बोगस डॉक्टरांची माहिती आरोग्य प्रशासनाला मिळताच आरोग्य विभागाच्यावतीने काल वसमत तालुक्यातील वेगवेगळ्या गावात सुरू असलेल्या तीन बोगस बंगाली डॉक्टर असलेल्या मुन्नाभाईच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आला आहे.

मित्राच्या पत्नीच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले, आरोपीच्या कृत्याने सगळेच हादरले
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हट्टा, आरळ आणि कुरुंदा या वेगवेगळ्या गावातील तिन्ही ठिकाणी असलेल्या मेडिकलची तपासणी करण्यात आली. या मुन्नाभाईकडे कोणते कागदपत्र आहेत, त्याची सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. परंतु, कोणत्याही कागदोपत्रांची नोंद नसलेले हे मुन्नाभाई रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आलं. हे बोगस बंगाली डॉक्टर वैद्यकीय कोणतेही शिक्षण नसताना रुग्णांची तपासणी करून उपचार करत असल्याचे दिसून आलं. यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांचा मेडिकलसाठा सुध्दा जप्त करण्यात आला आहे. तर एका ठिकाणी कार्यवाहीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाशी गावकऱ्यांनी हुज्जत घातली आहे.

आरोग्य विभागाकडून ही कार्यवाही करण्यात आल्यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. दिलेल्या अहवालानंतर, जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर इतर मुन्नाभाईंचे देखील चांगलेच धाबे दणाणले आहेत. शहरापासून काही अंतरावर असेलल्या दुर्गम भागातील गावामध्ये या बंगाली डॉक्टरांनी आपलं बस्तान मांडलं आहे. शहराचे अंतर बरेच राहत असल्यामुळे स्थानिक नागरिक यांच्याकडून उपचार करून घेतात.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज