अ‍ॅपशहर

धक्कादायक! लग्नाच्या ११ महिन्यानंतर तरुण शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, अर्ध्यावरच राहिला संसार

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने सेनगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली.

Maharashtra Times 21 Feb 2022, 6:05 pm
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर येथे तरुण शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. किशन अशोक माळेकर (२७) असे या शेतकऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hingoli news


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर शिवारात किशन माळेकर यांचे सुमारे सहा ते सात एकर शेत आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुसऱ्या शेतात जाऊ येतो असे सांगून शेतात गेले होते. मात्र साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने सेनगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली.

परळीत वातावरण तापलं, पंकजा मुंडेंच्या कार्यालयासमोर भाजप-काँग्रेसचे नेते आमने-सामने
पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, जमादार राठोड, राजू जाधव, अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत किशन माळेकर यांच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. तर ११ महिन्यापुर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे त्यांच्या परिवारासह गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वाचे लेख