अ‍ॅपशहर

गेल्या २४ तासात हिंगोली जिल्ह्यात ७ हून अधिक जणांचा मृत्यू, काय आहे कारण?

राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असताना हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना नियमांची होणारी पायमल्ली कधी थांबणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2022, 1:00 pm
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले असून चालकाकडून नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा महिन्यात शंभरहून भीषण आणि किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्‍या २४ तासाचा विचार केला असता. जिल्ह्यात ७ हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hingoli news
hingoli news


हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ कार ऑटो अपघातात ऑटो मधील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी ता. २१ सकाळी साडेदहा वाजता घडली आहे. अंकुश साहेबराव साबळे आणि अनुराधा अंकुश साबळे ( रा. लिंबाळा हुडी) अशी मयताची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पती म्हणून जुळ्या भावाने वहिनीवर केला बलात्कार, ६ महिन्यानंतर धक्कादायक खुलासा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी येथील अंकुश साबळे व त्यांची पत्नी अनुराधा साबळे हे दोघेजण ऑटोने आज सकाळी हिंगोलीकडे येत होते. त्यांची ऑटो हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ आली असताना अंकुश साबळे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळली.

'माझी नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही'; म्हणत रोमिओने तरुणीसोबत केला धक्कादायक प्रकार
या अपघातामध्ये अंकुश व अनुराधा या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर हिंगोली येथून सेनगांवकडे जाणाऱ्या कारमधील सेनगांव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुभाष चव्हाण हे देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. पोटे, जमादार पी.जी. डवले, महाजन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दोन्ही मयतांना उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत नरसी नामदेव पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

दरम्यान, या मार्गावर मागील काही दिवसांपासून अपघात वाढू लागले असून शुक्रवारीच टेम्पो कारच्या भीषण अपघातात एक जण ठार झाला होता. त्यानंतर आज कार व ऑटो अपघातात दोघेजण ठार झाले. त्यामुळे आणखी रस्ते अपघातात किती जणांचे बळी जाणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज