हिंगोली: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून थंडीची लाट कायम आहे. थंडीचा परिणाम मानवी जनजीवनावर दिसून येतो. तसाच तो प्राण्यांच्या जीवनावरही दिसून येतो आहे. वाढत्या थंडीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता वाढली असून व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय या नात्याने बहुसंख्यजण दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. ग्रामीण भागाचा आर्थिक कायापालट करणारा दुग्धव्यवसाय नेहमी पावसाळा, उन्हाळा तसेच हिवाळ्यातही अडचणीत येतो. दुभत्या पशुधनाची तीनही ऋतूत परवड होते. पावसाळ्यात तसेच नुकत्याच जानेवारी पूर्वार्धात झालेल्या अकाली पावसामुळे बऱ्याच भागात चारा सडला. आधीच पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. त्यात चाराटंचाई, पशुखाद्य महागाईमुळे पशुपालकांचे कंबरडे मोडले. जिवापाड जपलेल्या दुभत्या पशुधनाला कसे जपावे असे संकट दूध उत्पादकांना पडते. थंडीच्या लपंडावामुळे दुभते जनावर गाई - म्हशींवर परिणाम झाला असून दुग्ध उत्पादनात घट झाली आहे.
वाचाः आधी बलात्कार, नंतर गोळ्या देऊन गर्भपात; वेदना होत असतानाही डॉक्टरने केला अमानुष प्रकार
मागील तीन ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र थंडीची लाट पसरली. यामुळे मनुष्य सोबतच प्राण्यांनची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी पेरलेल्या चाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. सोबतच इतर कुटार, गवत साहित्य झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. बदलणाऱ्या वातावरणामुळे जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
वाचाः पुण्यात व्यवसाय करायचा म्हणून रचला खुनाचा कट; मुख्य सूत्रधाराला अटक
ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुरांच्या डोक्यावर कच्चे छत आहे. जर अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर अशा वेळी काय करावे, जनावरांचे खाद्य कुठे ठेवावे, अशी चिंता सध्या या शेतकऱ्यांना सतावते आहे.
वाचाः 'या' जिल्हाधिकाऱ्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनंतर आता आरोग्यमंत्रीही नाराज
वाचाः आधी बलात्कार, नंतर गोळ्या देऊन गर्भपात; वेदना होत असतानाही डॉक्टरने केला अमानुष प्रकार
मागील तीन ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र थंडीची लाट पसरली. यामुळे मनुष्य सोबतच प्राण्यांनची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी पेरलेल्या चाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. सोबतच इतर कुटार, गवत साहित्य झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. बदलणाऱ्या वातावरणामुळे जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
वाचाः पुण्यात व्यवसाय करायचा म्हणून रचला खुनाचा कट; मुख्य सूत्रधाराला अटक
ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुरांच्या डोक्यावर कच्चे छत आहे. जर अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर अशा वेळी काय करावे, जनावरांचे खाद्य कुठे ठेवावे, अशी चिंता सध्या या शेतकऱ्यांना सतावते आहे.
वाचाः 'या' जिल्हाधिकाऱ्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनंतर आता आरोग्यमंत्रीही नाराज