अ‍ॅपशहर

जळगावकरांना भरली हुडहुडी

उत्तर भारतातील भागातील राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे गेल्या आठवड्यापासून शहरात थंडी जाणवू लागली आहे. शहरातील किमान तापमानात घट होवून गुरुवारी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस अंशांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे जळगावकरांची उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी होत आहे.

Maharashtra Times 30 Nov 2018, 5:00 am
उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_5975


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

उत्तर भारतातील भागातील राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे गेल्या आठवड्यापासून शहरात थंडी जाणवू लागली आहे. शहरातील किमान तापमानात घट होवून गुरुवारी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस अंशांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे जळगावकरांची उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी होत आहे.

यंदा पावसाळा कमी झाला. त्याचबरोबर थंडीचे प्रमाणदेखील यावेळी कमी जाणवत आहे. नोव्हेंबरचे पहिले दोन आठवडे तर शहरात थंडीचा मागमूसदेखील नव्हता. मात्र, त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. तापमानाचा किमान पारा १२ अंशापर्यंत पोहचला होता. तो पारा किमान १३ अंशांपर्यंत आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे शहरात सर्दी, खोकल्यासारखे आजार व व्हायरल ईनफेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या थंडी वाढल्यामुळे हरभरा, गहू या रब्बी पिकांनादेखील फायदा होणार आहे. आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या शित वारे कायम राहणार असल्याने थंडीचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून थंडी वाढल्याने जळगावकरांची शहरातील उबदार कपडे विक्रेत्यांकडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. थंडीमुळे सकाळी व्यायाम करणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असून, थंडपेयांची मागणी कमी होऊन नागरिकांची पावले आता चहाच्या ठेल्यांकडे वळू लागली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज