अ‍ॅपशहर

जळगावात ऑक्सिजन पार्क

शहरात अमृत योजनेतून निर्माण होणाऱ्या हरितक्षेत्रांच्या माध्यमातून तब्बल २६ ऑक्सिजन पार्क साकारण्याचे काम सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, जळगाव शहराच्या तापमानाचा विचार करून या पार्कमध्ये वृक्षांची लागवड केली जाणार असल्याने जळगावकरांसाठी शुद्ध हवा असलेली ही ठिकाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत.

Maharashtra Times 23 Nov 2018, 5:00 am
‘अमृत’च्या माध्यमातून २६ हरितक्षेत्र; जळगावकरांच्या आरोग्याला फायदा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 oxygen park work approval in jalgaon city amrut schemes
जळगावात ऑक्सिजन पार्क


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरात अमृत योजनेतून निर्माण होणाऱ्या हरितक्षेत्रांच्या माध्यमातून तब्बल २६ ऑक्सिजन पार्क साकारण्याचे काम सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, जळगाव शहराच्या तापमानाचा विचार करून या पार्कमध्ये वृक्षांची लागवड केली जाणार असल्याने जळगावकरांसाठी शुद्ध हवा असलेली ही ठिकाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत.

अमृत अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीतून शहरात ठिकठिकाणी हरितक्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात सर्वांत प्रथम मेहरूण शिवारातील रायसोनीनगराच्या पुढे एक कोटी रुपये खर्च करून नवीन उद्यानाची निर्मिती सुरू झाली आहे. याशिवाय शहरात आणखी १५ हरितक्षेत्रांच्या निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. उद्यानांसाठी पालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर कामाला गती आली आहे. सध्या सवत्र ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अमृत योजनेत समाविष्ट असलेल्या शहरांसाठी हरितक्षेत्र निमाण करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. त्यानुसर पाच वर्षांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीतून दाट झाडी असलेली हरितक्षेत्रे तयार करण्यात येणार आहेत. यातूनच जळगाव महापालिकेलाही हा निधी मंजूर झाला आहे.

तीन वर्षांत काम पूर्ण होणार
महापालिकेला सन २०१५-१६ साठी ९९ लाख रुपयांचा निधी रायसोनी नगर येथील जागेवर हरितक्षेत्रासाठी मंजूर झाला आहे. या ठिकाणी ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सन २०१६-१७ साठी दीड कोटी रुपयांमधून शहरातील विविध प्रभागांत पाच ठिकाणी हरितक्षेत्रांना मंजुरी मिळाली आहे. कार्यादेश दिल्यानंतर चार ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. एका ठिकाणी लवकरच कामास सुरुवात होणार आहे. सन २०१६-१८ साठी २ कोटी रुपयांच्या निधीतून २० ठिकाणी हरितक्षेत्र विकास करण्यात येणार आहे. या कामांची निविदा प्रक्रिया झाली असून, मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आल्याने हे कामदेखील लगेचच सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यातून शिव कॉलनी ते रामानंद नगर घाटातील १०० फुटी रस्त्यांच्या दुतर्फा शेडप्रमाणे वृक्ष लावण्यात येणार आहेत. हरितक्षेत्र विकास म्हणजे महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवार शहराच्या तापमानाचा विचार करून तेथे त्या प्रकारच्या वृक्षांची लागवड करणे होय. त्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या सल्लागार असिन गोकण हरवंश यांनी जळगाव शहरातील या जागांची तपासणी करुन वृक्षांची निवड केली आहे. त्यानुसार संबंधित मक्तेदाराला ते वृक्ष लावावे लागणार आहेत.

पार्कची वैशिष्ट्ये...
वृक्षांचे रोपे ७ फूट उंच आहेत.
वृक्षांच्या प्रकारावर अंतर ठरविले जाणार
शहरातील २६ ठिकाणांची निवड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज