जळगाव, धुळ्यात कमाल पारा ४५ अंशावर
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा पुन्हा वाढला असून, नागरिकांना या झळा असह्य होत आहेत. शहराचे रविवारी (दि. २८) तापमान भारतीय हवामान संकेतस्थळानुसार कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर धुळे, नंदुरबारलाही कमाल तापमान ४५ अंशावर गेल्याने उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यातच हे तापमान असल्याने मे महिन्यात सूर्य किती तळपणार याबाबतची चर्चा सुरू आहे. तीन दिवस उष्णतेची लाट असल्याचा इशाराही सूत्रांकडून देण्यात आला असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी महत्त्वाच्या कामालाच बाहेर निघावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरात सकाळपासून ऊन जाणवत असून, सकाळी १० वाजेपासून सूर्य तापायला सुरुवात होत आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत स्मार्टफोननुसार कमाल तापमान हे ४६ ते ४७ अंशांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे. चोपडा, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, जामनेर या तालुक्यात तापमानाने चाळीिशी कधीच पार केलेली आहे. याठिकाणी पाणीटंचाईच्याही झळा नागरिकांना सहन कराव्या लागत असून, आता उन्हाने त्यात भर टाकली आहे.
उद्यानात गर्दी
आता एप्रिल महिना सुरू असून, मे महिन्यात अजून परिस्थिती बिकट होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन-तीन आठवडे उन्हाची तीव्रता जाणवणार असून, भारतीय संकेतस्थळानुसार येत्या तीन दिवसांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाढत्या शहरातील नेहमी गजबजणारे रस्ते सध्या ओस पडले आहेत. सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. शहरातील अनेक उद्याने ही पहाटेपासूनच खुली करण्यात आल्याने लहानग्यांना आणि ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. शाळांनाही सुट्या लागल्याले उद्यानात बालगोपाळ, ज्येष्ठ गर्दी करीत आहेत.
धुळे, नंदुरबारही ‘ताप’दायक
धुळे : धुळे आणि नंदुरबार शहरातही उन्हाचा पारा हा ४५ अंशांवर गेला असून, जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात तापमानाने केव्हाच चाळिशीपार केली आहे. सामान्य नागरिक महत्त्वाच्या कामानांच घराबाहेर पडत असल्याने रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात दिलासा मिळण्यासाठी खंडगार पेयांना मागणी वाढली असून, चौकाचौकांत शीतपेयांची दुकाने गर्दीन फुलू लागली आहेत. ऊसाचा रस, लिंबू सरबत, कोल्ड्रिंक्सना नागरिकांनी पसंती दिली आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा पुन्हा वाढला असून, नागरिकांना या झळा असह्य होत आहेत. शहराचे रविवारी (दि. २८) तापमान भारतीय हवामान संकेतस्थळानुसार कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर धुळे, नंदुरबारलाही कमाल तापमान ४५ अंशावर गेल्याने उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यातच हे तापमान असल्याने मे महिन्यात सूर्य किती तळपणार याबाबतची चर्चा सुरू आहे. तीन दिवस उष्णतेची लाट असल्याचा इशाराही सूत्रांकडून देण्यात आला असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी महत्त्वाच्या कामालाच बाहेर निघावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरात सकाळपासून ऊन जाणवत असून, सकाळी १० वाजेपासून सूर्य तापायला सुरुवात होत आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत स्मार्टफोननुसार कमाल तापमान हे ४६ ते ४७ अंशांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे. चोपडा, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, जामनेर या तालुक्यात तापमानाने चाळीिशी कधीच पार केलेली आहे. याठिकाणी पाणीटंचाईच्याही झळा नागरिकांना सहन कराव्या लागत असून, आता उन्हाने त्यात भर टाकली आहे.
उद्यानात गर्दी
आता एप्रिल महिना सुरू असून, मे महिन्यात अजून परिस्थिती बिकट होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन-तीन आठवडे उन्हाची तीव्रता जाणवणार असून, भारतीय संकेतस्थळानुसार येत्या तीन दिवसांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाढत्या शहरातील नेहमी गजबजणारे रस्ते सध्या ओस पडले आहेत. सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. शहरातील अनेक उद्याने ही पहाटेपासूनच खुली करण्यात आल्याने लहानग्यांना आणि ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. शाळांनाही सुट्या लागल्याले उद्यानात बालगोपाळ, ज्येष्ठ गर्दी करीत आहेत.
धुळे, नंदुरबारही ‘ताप’दायक
धुळे : धुळे आणि नंदुरबार शहरातही उन्हाचा पारा हा ४५ अंशांवर गेला असून, जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात तापमानाने केव्हाच चाळिशीपार केली आहे. सामान्य नागरिक महत्त्वाच्या कामानांच घराबाहेर पडत असल्याने रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात दिलासा मिळण्यासाठी खंडगार पेयांना मागणी वाढली असून, चौकाचौकांत शीतपेयांची दुकाने गर्दीन फुलू लागली आहेत. ऊसाचा रस, लिंबू सरबत, कोल्ड्रिंक्सना नागरिकांनी पसंती दिली आहे.