म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे हिवरा प्रकल्प परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील तब्बल ६८ मेंढ्या अचानक दगावल्या. यात मेंढपाळांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. अचानकपणे पाळीव मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांमध्ये घबराट पसरली असून, उष्माघाताने मेंढ्या दगावल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
खडकदेवळा खुर्द येथील हिवरा प्रकल्पाजवळच्या परिसरात मेंढपाळ सध्या मोठया संख्येने वास्तव्यास आहेत. या मेंढपाळांनी सकाळी मेंढ्या चरण्यास सोडल्या होत्या. या कळपातील जवळपास ६८ मेंढ्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांमध्ये एकच खळबळ उडाली. मेंढ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन, डॉ. एस. जी. मडावी, डॉ. गौतम वानखेडे, डॉ. सी. बी. परदेशी, डॉ. डी. एन. पाटील यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. डॉ. अशोक महाजन यांनी दगावलेल्या मेंढ्यांचे व्हिसेरा नाशिक येथे पाठविणार असल्याचे सांगितले. याचबरोबर तलाठी आर. पी. शिरसाठ यांनी पंचनामा केला. मेंढ्यांचा मृत्यू वाढत्या तापमानामुळे अथवा विषबाधेमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मेंढपाळांचे केवळ मेंढी पालनावरच त्यांचे कुटुंब अवलंबून असून ऐन दुष्काळी परिस्थित झालेल्या या प्रचंड नुकसानी मुळे मेंढपाळ हवालदिल झाले आहेत. तरी संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त मेंढपाळांनी केली आहे.
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे हिवरा प्रकल्प परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील तब्बल ६८ मेंढ्या अचानक दगावल्या. यात मेंढपाळांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. अचानकपणे पाळीव मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांमध्ये घबराट पसरली असून, उष्माघाताने मेंढ्या दगावल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
खडकदेवळा खुर्द येथील हिवरा प्रकल्पाजवळच्या परिसरात मेंढपाळ सध्या मोठया संख्येने वास्तव्यास आहेत. या मेंढपाळांनी सकाळी मेंढ्या चरण्यास सोडल्या होत्या. या कळपातील जवळपास ६८ मेंढ्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांमध्ये एकच खळबळ उडाली. मेंढ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन, डॉ. एस. जी. मडावी, डॉ. गौतम वानखेडे, डॉ. सी. बी. परदेशी, डॉ. डी. एन. पाटील यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. डॉ. अशोक महाजन यांनी दगावलेल्या मेंढ्यांचे व्हिसेरा नाशिक येथे पाठविणार असल्याचे सांगितले. याचबरोबर तलाठी आर. पी. शिरसाठ यांनी पंचनामा केला. मेंढ्यांचा मृत्यू वाढत्या तापमानामुळे अथवा विषबाधेमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मेंढपाळांचे केवळ मेंढी पालनावरच त्यांचे कुटुंब अवलंबून असून ऐन दुष्काळी परिस्थित झालेल्या या प्रचंड नुकसानी मुळे मेंढपाळ हवालदिल झाले आहेत. तरी संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त मेंढपाळांनी केली आहे.