अ‍ॅपशहर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धोक्यात, स्टेशनवर दोघांची तपासणी करताच पोलीस हादरले

Maharashtra Breaking News Today : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आहे का? असाच प्रश्न उपस्थित होतो. आधी रायगडमध्ये संशयित बोटी सापडल्या नंतर मुंबईला उडवून देण्यासाठी धमकीचा मेसेज आला. यानंतर आज पुन्हा हॉटेल ललितमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. या सगळ्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी मोठा कारवाई केली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2022, 1:53 pm
जळगाव : चोपडा शहरात तब्बल १२ गावठी कट्टे मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. गावठी कट्ट्यांसह हरियाणाच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. अमीतकुमार धनपत धानिया (वय ३० रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरियाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय ३२ रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरियाणा) अशी दोघा संशयीतांची नावे आहेत. (Mharashtra Jalgaon News Today)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terror attack in Maharashtra


मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी सांयकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास चोपडा बस स्थानक परिसरात संशयित अमीतकुमार धनपत धानिया आणि शनेशकुमार रामचंदर तक्षक यांच्याकडे २ लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच हजार रुपये किंमतीची ५ पिवळ्या धातुचे जिवंत काडतूस असून हे कोणास तरी विक्री करण्यासाठी आणले असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती.

मुंबई अलर्टवर! ललित हॉटेलला उडवून देण्याची धमकी, ४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती...

यानुसार पोलिसांनी दोघांना सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. दोन्ही संशयित आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे संशयित आरोपींजवळून तब्बल १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस आणि ३ मोबाईल फोन असा एकूण २ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली.

मुंबईला उडवण्याच्या धमकीनंतर पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, विरारमधून एकाला अटक
याआधीही अवैध शस्त्रांसंबंधी अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ६ गावठी कट्टे व ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही मोठी कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख