काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटलांची टीका
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा जणांचा जीव गेला आहे. या घटनांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, अत्यंत निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांना जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी कोल्हापूरच सांभाळावे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शनिवारी (दि. २) वरखेडे येथे भेट दिल्यानंतर शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सदस्यांनी वरखेडे येथे जावून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यात काही त्रुट्या आढळून आल्या असून, वनविभागाचे नियोजन अपुरे पडत आहे. तसेच शासन यंत्रणा काम करीत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची भीती अद्याप दूर झालेली नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्मचाऱ्यांची कुमक वाढवून गस्त वाढविली पाहिजे, असे मत यावेळी अॅड. पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील, गणेश पाटील, शिवाजी राजपूत, बाळासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अजूनही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सुसाबाई साळे व यमुनाबाई तिरमली या दोघांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत मिळालेली नसून, त्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. दोन दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही तर यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी काँग्रेस लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बिबट्या हल्ल्यासंबंधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडण्यांसदर्भांत चर्चा झाल्याचे सांगितले.
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा जणांचा जीव गेला आहे. या घटनांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, अत्यंत निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांना जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी कोल्हापूरच सांभाळावे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शनिवारी (दि. २) वरखेडे येथे भेट दिल्यानंतर शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सदस्यांनी वरखेडे येथे जावून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यात काही त्रुट्या आढळून आल्या असून, वनविभागाचे नियोजन अपुरे पडत आहे. तसेच शासन यंत्रणा काम करीत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची भीती अद्याप दूर झालेली नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्मचाऱ्यांची कुमक वाढवून गस्त वाढविली पाहिजे, असे मत यावेळी अॅड. पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील, गणेश पाटील, शिवाजी राजपूत, बाळासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अजूनही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सुसाबाई साळे व यमुनाबाई तिरमली या दोघांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत मिळालेली नसून, त्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. दोन दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही तर यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी काँग्रेस लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बिबट्या हल्ल्यासंबंधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडण्यांसदर्भांत चर्चा झाल्याचे सांगितले.