म. टा. प्रतिनिधी, जळगाव
तेरापंथ धर्म संघाचे आचार्य परंपरेचे उज्ज्वल नक्षत्र, शांतीदूत आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या ४५व्या दीक्षा दिनानिमित्त रविवारी (दि. २९) काढण्यात आलेल्या अहिंसा रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी आचार्यश्रींच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २८ बाटल्यांचे रक्तसंकलन झाले.
आचार्य श्री महाश्रमणजी यांचा दीक्षा दिवस देशभरात युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जळगावातही तेरापंथ युवक परिषदेच्यावतीने रविवारी, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान झालेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुरेश जैन उपस्थित होते. या सोबतच रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष राजेश धाडेवा, तेरापंथ सभेचे अध्यक्ष मनोज सुराणा, माणकचंद बेथ आदी उपस्थित होते.
आचार्यश्रींच्या दीक्षा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या अहिंसा रॅलीला सकाळी गणेश कॉलनी चौकापासून सुरुवात झाली. गुरुदेव तुलसी यांची ध्वनीफित असलेल्या मंगळपाठने रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये ज्ञानशाळेच्या मुला-मुलींसह समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीदरम्यान ‘तेरापंथ समाज की क्या पहचान, एक गुरु-एक विधान...’, ‘संयम खलू जीवनम्, संयमही जीवन है..’, ‘आचार्य श्री महाश्रमण की जय...’, ‘जैन धर्म की जय...’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या. सोबतच विविध गीत, भजनही सादर करण्यात आले. रॅलीमध्ये समाजबांधवांचे अपूर्व उत्साह होता.
आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेने संपूर्ण देशभरात लाखो भाविक प्रभावित झाले असून, युवकांतर्फे करण्यात येणारे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश जैन यांनी व्यक्त केले. अहिंसा रॅली अणुव्रत भवन येथे पोहचल्यानंतर रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तेरापंथ समाज लहान असला तरी संघटित तसेच अनुशासित आहे, असे गौरोवद्गारही जैन यांनी काढले. या वेळी राजेश धाडेवा यांनी आचार्यश्रींच्या अहिंसा यात्रेची माहिती दिली. सूत्रसंचालन पवन सिंघी यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी जितेंद्र चोरडिया, पवन सुराणा, रितेश छाजेड, मनोज नहाटा यांनी परिश्रम घेतले.
तेरापंथ धर्म संघाचे आचार्य परंपरेचे उज्ज्वल नक्षत्र, शांतीदूत आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या ४५व्या दीक्षा दिनानिमित्त रविवारी (दि. २९) काढण्यात आलेल्या अहिंसा रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी आचार्यश्रींच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २८ बाटल्यांचे रक्तसंकलन झाले.
आचार्य श्री महाश्रमणजी यांचा दीक्षा दिवस देशभरात युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जळगावातही तेरापंथ युवक परिषदेच्यावतीने रविवारी, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान झालेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुरेश जैन उपस्थित होते. या सोबतच रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष राजेश धाडेवा, तेरापंथ सभेचे अध्यक्ष मनोज सुराणा, माणकचंद बेथ आदी उपस्थित होते.
आचार्यश्रींच्या दीक्षा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या अहिंसा रॅलीला सकाळी गणेश कॉलनी चौकापासून सुरुवात झाली. गुरुदेव तुलसी यांची ध्वनीफित असलेल्या मंगळपाठने रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये ज्ञानशाळेच्या मुला-मुलींसह समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीदरम्यान ‘तेरापंथ समाज की क्या पहचान, एक गुरु-एक विधान...’, ‘संयम खलू जीवनम्, संयमही जीवन है..’, ‘आचार्य श्री महाश्रमण की जय...’, ‘जैन धर्म की जय...’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या. सोबतच विविध गीत, भजनही सादर करण्यात आले. रॅलीमध्ये समाजबांधवांचे अपूर्व उत्साह होता.
आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेने संपूर्ण देशभरात लाखो भाविक प्रभावित झाले असून, युवकांतर्फे करण्यात येणारे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश जैन यांनी व्यक्त केले. अहिंसा रॅली अणुव्रत भवन येथे पोहचल्यानंतर रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तेरापंथ समाज लहान असला तरी संघटित तसेच अनुशासित आहे, असे गौरोवद्गारही जैन यांनी काढले. या वेळी राजेश धाडेवा यांनी आचार्यश्रींच्या अहिंसा यात्रेची माहिती दिली. सूत्रसंचालन पवन सिंघी यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी जितेंद्र चोरडिया, पवन सुराणा, रितेश छाजेड, मनोज नहाटा यांनी परिश्रम घेतले.