अ‍ॅपशहर

शेतकरी कुटुंबांना धनादेश वाटप

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविलेल्या तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखांची शासकीय मदत देण्यात आली.

Maharashtra Times 4 Sep 2017, 4:00 am
चाळीसगाव : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविलेल्या तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखांची शासकीय मदत देण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम allocate checks to the farmers family at pachora
शेतकरी कुटुंबांना धनादेश वाटप


या मदतीचे धनादेश आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सोपविण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेंतर्गत २६ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजारांची मदत देण्यात आली. पाचोरा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा हा कार्यक्रम पार पडला. या वेळी तहसीलदार बी. ए. कापसे, नायब तहसीलदार अमित भोईटे उपस्थित होते. नेरी येथील बाळू भास्कर शेलार, आनंदा कोळी (कुरंगी), कोकडी येथील युवराज जाधव यांच्या वारसांना ३० हजारांचा धनादेश व ७० हजारांचे पोस्ट बचत प्रमाणपत्र देण्यात आले. प्रसंगी अरुण पाटील, पद्मसिंह पाटील, गणेश पाटील, भरत खंडेलवाल उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज