अ‍ॅपशहर

धार्मिक आखाड्यात रंगली राजकीय नेत्यांची दंगल

अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर संत सखाराम महाराज यात्रोत्सावाचा ध्वजारोहण व स्तंभारोपण हा धार्मिक कार्यक्रम मंगळवारी (दि. ७) अमळनेरमध्ये पार पडला. या वेळी शहराचे आजी-माजी आमदारांमधील शाब्दिक वाद चर्चेचा विषय ठरला.

Maharashtra Times 8 May 2019, 5:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमळनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amalner political leaders issue at sant sakharam maharaj yatra
धार्मिक आखाड्यात रंगली राजकीय नेत्यांची दंगल

अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर संत सखाराम महाराज यात्रोत्सावाचा ध्वजारोहण व स्तंभारोपण हा धार्मिक कार्यक्रम मंगळवारी (दि. ७) अमळनेरमध्ये पार पडला. या वेळी शहराचे आजी-माजी आमदारांमधील शाब्दिक वाद चर्चेचा विषय ठरला.
अमळनेरमध्ये मंगळवारी (दि. ७) संत सखाराम महाराज यात्रोत्सवात आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. या वेळी द्विशताब्दी महोत्सवाला माजी आमदार साहेबराव पाटलांनी पाण्याची चांगली व्यवस्था केल्याचे प्रसाद महाराजांनी सांगितले. त्यावर नगरपालिकेचे गटनेते बबली पाठक यांनी, 'आता तुम्ही जेवढे दिवस आहात तेवढे दिवस तरी शहराला पुरेसा पाणीपुरवठा करा', असा टोमणा मारला. त्यावर साहेबराव पाटील यांनी संतापून 'हा चर्चेचा आखाडा नाही कुस्तीच खेळायची तर चला बोरी पात्रात म्हणत उभे राहून दंड थोपटले'. पाडळसरे धरणाला निधी आणायची बोंब पडली नाही, ते कोणामूळे बंद पडले ते पहा, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. यावरून बाजूलाच बसलेल्या आमदार शिरीष चौधरी यांनी वादात उडी घेत, 'आता तुम्ही जे कलाली डोहातून पाणी घेऊन शहराला पुरवठा करतात. त्या तात्पुरत्या योजनेला तुम्हीच विरोध केला होता' असा उपरोधिक टोमणा मारला. यानंतर प्रसाद महाराजांनी गटनेते पाठक यांना शांत केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज