म. टा. प्रतिनिधी, जळगाव
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोषात सुभाष चौक परिसरात तब्बल तीन हजार गणेशभक्तांनी रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले. विश्व कल्याणासाठी याचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.
शहरातील सुभाष चौक परिसरात रविवारी सकाळी ९ वाजता याला ओंकार ध्वनी, शंखनादाने प्रारंभ करण्यात आला. याचे आयोजन सुभाष चौक मित्रमंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था व स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रारंभी आचार्य पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि विजय निकम यांनी अथर्वशीर्षाचे महात्म्य सांगितले. यानंतर गणपती पूजन, ओंकारध्वनी, शंखनाद शांतीपाठाद्वारे अथर्वशीर्षाला सुरुवात करण्यात आली.
सूत्रसंचालन संजय गांधी यांनी केले तर आभार विजय जगताप यांनी मानले. आंब्याची तोरणे, झेंडूच्या फुलाच्या माळा, भगवे ध्वज, व गोमूत्र शिंपडल्याने वातावरण मंगलमय झाले होते. सामूहिक अथर्वशीर्षाचे लागोपाठ २१ आवर्तने म्हटली गेली. याप्रमाणे ५० हजारपेक्षा अधिक सामूहिक आवर्तने करण्यात आली. या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढून ५१ भाग्यवंत गणेशभक्तांना गणपतीचे चांदीचे शिक्के देण्यात आले. यशस्वीतेसाठी श्रीकांत खटोड, मनीष अग्रवाल, प्रवीण बांगर, संजय पांडे, भरतकुमार शहा, गोपाल पाटील, अलोक अग्रवाल, अक्षय खटोड, नरेंद्र कापडणे, महेश दायमा, मयूर कासार, महेश गोला यांच्यासह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोषात सुभाष चौक परिसरात तब्बल तीन हजार गणेशभक्तांनी रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले. विश्व कल्याणासाठी याचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.
शहरातील सुभाष चौक परिसरात रविवारी सकाळी ९ वाजता याला ओंकार ध्वनी, शंखनादाने प्रारंभ करण्यात आला. याचे आयोजन सुभाष चौक मित्रमंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था व स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रारंभी आचार्य पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि विजय निकम यांनी अथर्वशीर्षाचे महात्म्य सांगितले. यानंतर गणपती पूजन, ओंकारध्वनी, शंखनाद शांतीपाठाद्वारे अथर्वशीर्षाला सुरुवात करण्यात आली.
सूत्रसंचालन संजय गांधी यांनी केले तर आभार विजय जगताप यांनी मानले. आंब्याची तोरणे, झेंडूच्या फुलाच्या माळा, भगवे ध्वज, व गोमूत्र शिंपडल्याने वातावरण मंगलमय झाले होते. सामूहिक अथर्वशीर्षाचे लागोपाठ २१ आवर्तने म्हटली गेली. याप्रमाणे ५० हजारपेक्षा अधिक सामूहिक आवर्तने करण्यात आली. या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढून ५१ भाग्यवंत गणेशभक्तांना गणपतीचे चांदीचे शिक्के देण्यात आले. यशस्वीतेसाठी श्रीकांत खटोड, मनीष अग्रवाल, प्रवीण बांगर, संजय पांडे, भरतकुमार शहा, गोपाल पाटील, अलोक अग्रवाल, अक्षय खटोड, नरेंद्र कापडणे, महेश दायमा, मयूर कासार, महेश गोला यांच्यासह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.