रेल्वे अभियंत्याशी चर्चा; पाइपलाइनद्वारे निचरा करणार
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
नवीन समांतर बजरंग बोगदा बांधताना त्यात पाणी साचू नये म्हणून उपाययोजना न केल्याने या नुकत्याच पूर्ण झालेल्या या बोगद्यात पावसाचे पाणी साचले आहे. ते पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा करताच रेल्वे प्रशासनाने आटापिटा सुरू केला आहे. यासाठी बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या रेल्वे अभियंत्याशी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी चर्चा केली. या बोगद्यातून पाइप टाकून पाणी नाल्यापर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
महापालिकेने साडे तीन कोटी रुपयांचा खर्च करून रेल्वे प्रशासनाकडून या बजरंग बोगद्याला पर्याय म्हणून दोन समांतर बोगद्यांचे काम करून घेतले. सुरुवातीला हे काम रेल्वेचे अभियंता शशिकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. बोगद्यामध्ये नाल्याचे पाणी साचू नये यासाठी गणेश कॉलनीच्या बाजूकडून नाल्याचे पाणी मुक्ताईनगरकडील नाल्याकडे वळविण्याचे नियोजन होते. तसेच हा नाला स्थलांतरित करण्याचाही विचार त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. काम पूर्ण होईपर्यंत शशिकांत पाटील यांच्याचकडे हे काम होते. मात्र, त्यानंतर त्यांची बदली झाल्यामुळे नंतरच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या गांभीर्याने न घेतल्याने पहिल्याच पावसात नवीन बजरंग बोगद्यात तळे साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. बोगद्याचा कामाबद्दल नागरिकांकडून तक्रारी सुरू झाल्यानतंर महापालिका प्रशासनाने सरळ रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखविले आहे.
विशेष म्हणजे, अभियंता शशिकांत पाटील यांची पाचोरा येथे झालेली बदली रद्द होऊन त्यांची जळगावला बदली झाल्याने त्यांनी या कामात लक्ष घातले आहे. गुरुवारी शशिकांत पाटील यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांची दुपारी महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत बजरंग बोगद्याचा कामांबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मोटारपंपिंगद्वारे नवीन बोगद्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर गणेश कॉलनी साइडच्या नाल्याचे खोलीकरण करून, पाइपलाइनद्वारे या नाल्यातील पाणी मुक्ताईनगर साइडच्या नाल्यात वळविण्यात यावे, असे या चर्चेत ठरले आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
नवीन समांतर बजरंग बोगदा बांधताना त्यात पाणी साचू नये म्हणून उपाययोजना न केल्याने या नुकत्याच पूर्ण झालेल्या या बोगद्यात पावसाचे पाणी साचले आहे. ते पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा करताच रेल्वे प्रशासनाने आटापिटा सुरू केला आहे. यासाठी बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या रेल्वे अभियंत्याशी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी चर्चा केली. या बोगद्यातून पाइप टाकून पाणी नाल्यापर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
महापालिकेने साडे तीन कोटी रुपयांचा खर्च करून रेल्वे प्रशासनाकडून या बजरंग बोगद्याला पर्याय म्हणून दोन समांतर बोगद्यांचे काम करून घेतले. सुरुवातीला हे काम रेल्वेचे अभियंता शशिकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. बोगद्यामध्ये नाल्याचे पाणी साचू नये यासाठी गणेश कॉलनीच्या बाजूकडून नाल्याचे पाणी मुक्ताईनगरकडील नाल्याकडे वळविण्याचे नियोजन होते. तसेच हा नाला स्थलांतरित करण्याचाही विचार त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. काम पूर्ण होईपर्यंत शशिकांत पाटील यांच्याचकडे हे काम होते. मात्र, त्यानंतर त्यांची बदली झाल्यामुळे नंतरच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या गांभीर्याने न घेतल्याने पहिल्याच पावसात नवीन बजरंग बोगद्यात तळे साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. बोगद्याचा कामाबद्दल नागरिकांकडून तक्रारी सुरू झाल्यानतंर महापालिका प्रशासनाने सरळ रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखविले आहे.
विशेष म्हणजे, अभियंता शशिकांत पाटील यांची पाचोरा येथे झालेली बदली रद्द होऊन त्यांची जळगावला बदली झाल्याने त्यांनी या कामात लक्ष घातले आहे. गुरुवारी शशिकांत पाटील यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांची दुपारी महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत बजरंग बोगद्याचा कामांबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मोटारपंपिंगद्वारे नवीन बोगद्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर गणेश कॉलनी साइडच्या नाल्याचे खोलीकरण करून, पाइपलाइनद्वारे या नाल्यातील पाणी मुक्ताईनगर साइडच्या नाल्यात वळविण्यात यावे, असे या चर्चेत ठरले आहे.